Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला भारतीय कर्णधार

  143

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना इंग्लंडशी झाला. दोन्ही संघादरम्यान हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. त्यांचा सामना आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. फायनलचा सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.



रोहितने अर्धशतक ठोकत रचला इतिहास


इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. रोहित असा कर्णधार आहे ज्याने टी-२० वर्ल्डकपच्या नॉकआऊट सामन्यात ५० आणि त्याहून अधिक धावा केल्यात. रोहितने ३९ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.


रोहितने या खेळी दरम्यान भारतीय कर्णधाराने ५००० धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो पाचवा कर्णधार आहे. रोहितच्या आधी विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हे यश मिळवले होते.


विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे. कोहलीने कर्णधार म्हणून एकूण२१३ सामन्यांमध्ये १२८३३ धावा केल्यात तर धोनी ११२०७ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ८०९५ धावा आणि सौरव गांगुली ७६४३ धावा यांचा नंबर लागतो.


रोहित शर्माला २०२१मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२२मध्ये विराट कोहली कसोटी कर्णधारापासून दूर झाल्यानंतर त्याला नेतृत्व सोपवण्यात आले.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट