Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला भारतीय कर्णधार

  139

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना इंग्लंडशी झाला. दोन्ही संघादरम्यान हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. त्यांचा सामना आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. फायनलचा सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.



रोहितने अर्धशतक ठोकत रचला इतिहास


इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. रोहित असा कर्णधार आहे ज्याने टी-२० वर्ल्डकपच्या नॉकआऊट सामन्यात ५० आणि त्याहून अधिक धावा केल्यात. रोहितने ३९ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.


रोहितने या खेळी दरम्यान भारतीय कर्णधाराने ५००० धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो पाचवा कर्णधार आहे. रोहितच्या आधी विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हे यश मिळवले होते.


विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे. कोहलीने कर्णधार म्हणून एकूण२१३ सामन्यांमध्ये १२८३३ धावा केल्यात तर धोनी ११२०७ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ८०९५ धावा आणि सौरव गांगुली ७६४३ धावा यांचा नंबर लागतो.


रोहित शर्माला २०२१मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२२मध्ये विराट कोहली कसोटी कर्णधारापासून दूर झाल्यानंतर त्याला नेतृत्व सोपवण्यात आले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार