मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण ११.२५ मिलियन यूएस डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली होती. भारतीय पैशांमध्ये ही रक्कम एकूण ९३.५ कोटी रूपये इतकी आहे.
२०२२मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत ही बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. कारण २ वर्षांपूर्वी ही रक्कम ४६.६ कोटी रूपये इतकी होती. यातील विजेता संघ इंग्लंडला तब्बल १३.३ कोटी रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. जाणून घेऊया २०२४च्या टी-२० वर्ल्डकप विजेता बनणाऱ्या संघाला किती रूपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.
टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने असतील. यातील जो विजेता बनेल. त्याला भारतीय पैशांनुसार २०.४ कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरीकडे उपविजेता संघाला याच्या अर्धी रक्कम म्हणजेच १०.६ कोटी रूपये दिले जातील. या वर्ल्डकपमध्ये सर्वात खालच्या स्थानावरील संघालाही पैसे दिले जातील. सेमीफायनलमध्ये पराभूत होणारे संघही मालामाल होतील. कारण त्या दोन संघांना तब्बल साडेसहा कोटी रूपये मिळणार आहेत.
टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये प्रत्येक सामना जिंकल्यावर २६ लाख रूपये वेगळे मिळणार. आयसीसीने ही बक्षिसाची रक्कम आपल्या प्रावधानात जोडली आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या स्पर्धेत एखादा संघ केवळ एकदा विजय मिळवू शकला तर त्यांना २६ लाख रूपये वेगळे मिळतील. तर २ सामने जिंकणाऱ्या संघाला ५२ लाख रूपये वेगळे मिळतील.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…