पैसाच पैसा, टी-२० वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल, रनर-अप संघावरही कोट्यावधींचा पाऊस

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण ११.२५ मिलियन यूएस डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली होती. भारतीय पैशांमध्ये ही रक्कम एकूण ९३.५ कोटी रूपये इतकी आहे.


२०२२मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत ही बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. कारण २ वर्षांपूर्वी ही रक्कम ४६.६ कोटी रूपये इतकी होती. यातील विजेता संघ इंग्लंडला तब्बल १३.३ कोटी रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. जाणून घेऊया २०२४च्या टी-२० वर्ल्डकप विजेता बनणाऱ्या संघाला किती रूपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.


टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने असतील. यातील जो विजेता बनेल. त्याला भारतीय पैशांनुसार २०.४ कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरीकडे उपविजेता संघाला याच्या अर्धी रक्कम म्हणजेच १०.६ कोटी रूपये दिले जातील. या वर्ल्डकपमध्ये सर्वात खालच्या स्थानावरील संघालाही पैसे दिले जातील. सेमीफायनलमध्ये पराभूत होणारे संघही मालामाल होतील. कारण त्या दोन संघांना तब्बल साडेसहा कोटी रूपये मिळणार आहेत.



प्रत्येक सामना जिंकल्यास २६ लाख रूपये


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये प्रत्येक सामना जिंकल्यावर २६ लाख रूपये वेगळे मिळणार. आयसीसीने ही बक्षिसाची रक्कम आपल्या प्रावधानात जोडली आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या स्पर्धेत एखादा संघ केवळ एकदा विजय मिळवू शकला तर त्यांना २६ लाख रूपये वेगळे मिळतील. तर २ सामने जिंकणाऱ्या संघाला ५२ लाख रूपये वेगळे मिळतील.

Comments
Add Comment

सलग तीन पराभवानंतरही भारताच्या आशा कायम, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा आहे रस्ता

इंदूर: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये यजमान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात अवघ्या ४

IND vs ENG: इंग्लंडने भारताच्या विजयाचा घास हिरावला, वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा पराभव

इंदोर: इंदोरच्या मैदानावर आज भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

कसोटी क्रिेकेटमधून निवृत्तीनंतर लंडनमध्येच राहण्याच्या निर्णयावर कोहलीने सोडले मौन

कॅनबेरा : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनमध्येच का राहण्याचा

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी

स्मृती मानधना लवकरच 'इंदूरची सून' होणार! प्रियकर पलाश मुच्छलने भर कार्यक्रमात दिली लग्नाची कबुली

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना लवकरच