मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला ६८ धावांनी हरवले. आता फायनलमध्ये भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी भारताने १७१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या स्पिनर्सनी कमाल केली आणि इंग्लंडला डाव १०३ धावांत गुंडाळला. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी केली होती.
भारताची सुरूवात तशी ठीकठाक झाली. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेला विराट कोहली या सामन्यातही अपयशी ठरला. भारताने १९ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेला ऋषभ पंतही केवळ ४ धावा करू शकला.
त्यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. सूर्याने ३६ बॉलमध्ये ४७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. मात्र त्यालाही २३ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा १७ धावांवर नाबाद राहिला. तर अक्षऱ पटेलने १० धावा केल्या.
त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज फलंदाजीसाठी उतरले. मात्र स्पिनर्सनी कमाल करत जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या अक्षऱ पटेल, कुलदीप यादव या दोघांनी तर अफलातून गोलंदाजी केली आणि इंग्लंडला सळो की पळो करून टाकले.
आता भारताचा फायनलमध्ये सामना २९ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला हरवले आणि फायनलमध्ये एंट्री घेतली
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…
तज्ज्ञांकडून धक्कादायक खुलासा मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून…
इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता…
मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावरून (Nashik Mumbai Highway) प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी (Toll) आता अधिक रक्कम मोजावी…
शिंदे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने मुख्यमंत्र्यांचं जनतेला खास पत्र मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात…