IND vs ENG: अक्षर, कुलदीपची कमाल, इंग्लंडला नमवत टीम इंडिया दिमाखात फायनलमध्ये

मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला ६८ धावांनी हरवले. आता फायनलमध्ये भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी भारताने १७१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या स्पिनर्सनी कमाल केली आणि इंग्लंडला डाव १०३ धावांत गुंडाळला. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी केली होती.


भारताची सुरूवात तशी ठीकठाक झाली. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेला विराट कोहली या सामन्यातही अपयशी ठरला. भारताने १९ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेला ऋषभ पंतही केवळ ४ धावा करू शकला.


त्यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. सूर्याने ३६ बॉलमध्ये ४७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. मात्र त्यालाही २३ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा १७ धावांवर नाबाद राहिला. तर अक्षऱ पटेलने १० धावा केल्या.


त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज फलंदाजीसाठी उतरले. मात्र स्पिनर्सनी कमाल करत जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या अक्षऱ पटेल, कुलदीप यादव या दोघांनी तर अफलातून गोलंदाजी केली आणि इंग्लंडला सळो की पळो करून टाकले.


आता भारताचा फायनलमध्ये सामना २९ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला हरवले आणि फायनलमध्ये एंट्री घेतली
Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना