IND vs ENG: अक्षर, कुलदीपची कमाल, इंग्लंडला नमवत टीम इंडिया दिमाखात फायनलमध्ये

मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला ६८ धावांनी हरवले. आता फायनलमध्ये भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी भारताने १७१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या स्पिनर्सनी कमाल केली आणि इंग्लंडला डाव १०३ धावांत गुंडाळला. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी केली होती.


भारताची सुरूवात तशी ठीकठाक झाली. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेला विराट कोहली या सामन्यातही अपयशी ठरला. भारताने १९ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेला ऋषभ पंतही केवळ ४ धावा करू शकला.


त्यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. सूर्याने ३६ बॉलमध्ये ४७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. मात्र त्यालाही २३ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा १७ धावांवर नाबाद राहिला. तर अक्षऱ पटेलने १० धावा केल्या.


त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज फलंदाजीसाठी उतरले. मात्र स्पिनर्सनी कमाल करत जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या अक्षऱ पटेल, कुलदीप यादव या दोघांनी तर अफलातून गोलंदाजी केली आणि इंग्लंडला सळो की पळो करून टाकले.


आता भारताचा फायनलमध्ये सामना २९ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला हरवले आणि फायनलमध्ये एंट्री घेतली
Comments
Add Comment

लॉर्कनच्या तुफानी खेळीने आयर्लंडचा विजय, ओमानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी

कोलंबो  : आयर्लंडने आपल्या फलंदाजीच्या जोरावर टी-२० विश्वचषकात नवा इतिहास रचला आहे. प्रभारी कर्णधार लॉर्कन

T20 World Cup 2026 IND vs PAK: अभिषेक शर्माबद्दल बोलताना पाकिस्तानी बॉलरची जीभ घसरली; म्हणाला...

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

T20 World Cup 2026 IND vs PAK : भारत-पाक मॅच रद्द झाल्यास सुपर ८ मध्ये कुठली टीम जाणार ?

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर