Farmers protest : विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचं दूध ओतून आंदोलन!

प्रतिलीटर दुधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक


मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session of Legislature) आज दुसरा दिवस असून विधानभवनाबाहेर (Vidhanbhavan) दूध उत्पादक शेतकरी (Dairy farmers) आक्रमक झाले आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने ते संतप्त झाले आहेत. या संतापातच त्यांनी विधानभवनाबाहेर दूध ओतून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या प्रतिलीटर दूधाला ४० रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी हातामध्ये सरकारविरोधातील फलक घेऊन त्यांनी आदोलन केले. १५ हजार टन दूध पावडर आयात का केली जातेय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच प्रतिलीटर दुधाला ४० रुपये भाव मिळावा अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे. यावेळी विधानभवनाबाहेर काही आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


दरम्यान, एकीकडे विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे दूध दरवाढीमुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. याप्रकरणी सध्या महाराष्ट्रभर ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.

Comments
Add Comment

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी