Neet paper leak case : नीट पेपरलीक प्रकरणी बिहारमधून दोघांना अटक

सीबीआयची कारवाई, अनेकांवर टांगती तलवार


पाटणा : नीट पेपरलीक प्रकरणी (Neet paper leak case) सीबीआयने (CBI) आज बिहारमधून (Bihar) पहिली अटक केली आहे. सीबीआयने पाटणा येथून मनीष प्रकाश (Manish Prakash) आणि आशुतोष कुमार (Ashutosh Kumar) या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पेपरफुटीप्रकरणी चिंटू आणि मुकेश या दोन आरोपींना सीबीआयने रिमांडवर घेतले आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणात अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मनीष प्रकाश याने आशुतोष कुमारच्या मदतीने नीट परीक्षेच्या एक दिवस आधी (४ मे) बिहारच्या पाटण्यातील एका शाळेतील वसतिगृहात उमेदवारांना बसवून नीट परीक्षेचे पेपर आणि उत्तर पत्रिका दिली होती. सीबीआयने अखेर या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


दरम्यान, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर याविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, दोन आरोपींना आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अनेकांची नावे येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन