Neet paper leak case : नीट पेपरलीक प्रकरणी बिहारमधून दोघांना अटक

सीबीआयची कारवाई, अनेकांवर टांगती तलवार


पाटणा : नीट पेपरलीक प्रकरणी (Neet paper leak case) सीबीआयने (CBI) आज बिहारमधून (Bihar) पहिली अटक केली आहे. सीबीआयने पाटणा येथून मनीष प्रकाश (Manish Prakash) आणि आशुतोष कुमार (Ashutosh Kumar) या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पेपरफुटीप्रकरणी चिंटू आणि मुकेश या दोन आरोपींना सीबीआयने रिमांडवर घेतले आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणात अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मनीष प्रकाश याने आशुतोष कुमारच्या मदतीने नीट परीक्षेच्या एक दिवस आधी (४ मे) बिहारच्या पाटण्यातील एका शाळेतील वसतिगृहात उमेदवारांना बसवून नीट परीक्षेचे पेपर आणि उत्तर पत्रिका दिली होती. सीबीआयने अखेर या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


दरम्यान, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर याविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, दोन आरोपींना आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अनेकांची नावे येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत