Ashish Shelar : कालच्या निवडणुकीत ठाकरे गटाने पैशांचा धुमाकूळ घातला!

'अभ्यंकर भयंकर' तर 'परब अरब' असल्याप्रमाणे त्यांचे लोक पैसे वाटत होते...


आशिष शेलार यांचा उबाठा सेनेवर गंभीर आरोप


मुंबई : लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विधानपरिषद निवडणुका (Vidhanparishad Election) जाहीर झाल्या. या निवडणुकांमध्येही महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात जोरदार टक्कर असल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील शिक्षक व पदवीधर अशा चार मतदारसंघांमध्ये काल म्हणजेच मंगळवारी २६ जून रोजी मतदान पार पडलं. मात्र, या निवडणुकीसंदर्भात भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मोठा दावा केला आहे. निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाकडून (Thackeray Group) पैशांचं वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


विधीमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. तसेच, मतदार भाजपा उमेदवारांवर विश्वास दर्शवतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “काल विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. पण याचा जाणुनबुजून उल्लेख करावा लागेल की उबाठा सेनेने काल पैशांचा धुमाकूळ घातला होता”, असा आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला.


पुढे ते म्हणाले, “शिक्षकांमधून उमेदवार असलेले अभ्यंकर भयंकर असल्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तर दुसरीकडे पदवीधर मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार असणारे परब अरब असल्याप्रमाणे त्यांचे लोक पैसे वाटण्याचं काम करत होते. त्यामुळेच पैशाच्या जोरावर मतदारांना विकत घेता येतं असं मानून पैशांचा धुमाकूळ उबाठा सेनेने घातला. काही अन्य उमेदवारांनीही त्यांना साथ दिली. पण भाजपाचे दोन्ही उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संघटनेची पूर्ण ताकद लावली. माझा मतदारांवर विश्वास आहे. आमचा विजय मतदार सुकर करतील असा माझा दावा आहे”, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.