Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही!

चंद्रशेखर बावनकुळे यांचे विरोधकांवर जोरदार टीकास्त्र


२०२९ च्या निवडणुकीतही जनता एनडीएच्या पाठिशी राहणार


मुंबई : संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही. त्यांची कोणी दखलही घेत नाही. संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना फक्त माध्यमच महत्व देत आहेत. राऊतांचे बोलणे त्यांचे त्यांना लखलाभ आहे. राऊतांनी काय बोलावे यात मी पडत नाही, अशी बोचरी टीका भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह विरोधकांनाही खोचक टोला लगावला.


चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीनंतरचे चित्र स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांना महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले असता महायुती पक्की असून 'राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येईल', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आत्तापासून तयारी सुरु करण्यात येत आहे, असेही त्यांनी म्हटले.


त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना माध्यमच महत्व देत आहेत. राऊतांचे बोलणे त्यांना लखलाभ आहे. मात्र राऊतांना उत्तर देण्यासाठी भाजपाकडे वेळ नाही, त्यामुळे त्यांनी काय बोलावे यात मी पडत नाही' अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.



राज्यात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार


पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात महायुती पक्की आहे. पुढील काळातही पक्कीच राहणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतू नाही. आमच्याकडून कधीच मोठा म्हणून लहान भावाला त्रास नाही. जे नेते काही बोलत असतील तर त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नेत्यांना समज द्यायला हवी.



२०२९ च्या निवडणुकीतही जनता एनडीएच्या पाठिशी


भाजपा कधीच पळ काढू शकत नाही. या निवडणुकीत देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ठामपणे उभी राहिली आहे. २०२९ च्या निवडणुकीतही देशाची जनता मोठे पाठबळ एनडीएच्या (NDA) पाठिशी उभी राहणार आहे.



मंत्रिमंडळाचा विस्तारीकरणाचा हक्क एकनाथ शिंदे यांनाच


राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्री शिंदे हे योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. राज्यातील भौगोलिक आणि १४ कोटी जनतेच्या फायद्यासाठी महायुतीतीतल तिन्ही घटक पक्षांच्या आमदारांना मंत्रिपदे मिळायला हवी. कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या पाहिजे, याबाबत केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार आहेत.


ज्या पक्षाचे नेते आपल्या नेतृत्वाला जागांबाबत मागणी करीत असतात किती जागा मान्य करायचा हा वरिष्ठांचा अधिकार आहे. कुठल्याही जागेसंदर्भातील चर्चा माध्यमांमध्ये मान्य होऊ शकत नाही, त्यासाठी तिन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन सन्मानजनक जागावाटप करावे आणि एकदिलाने आम्ही महायुती म्हणून सामोरं जाणार असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी म्हटले.

Comments
Add Comment

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार नेसा 'या' शुभ रंगांची साडी

मुंबई : विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही तासांवर

Vat Purnima 2026: यंदाची वटपौर्णिमा ठरणार खास; सोमवारी दुर्मिळ शुभ संयोग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार असून या वर्षीचा सण धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे.

Soccer Ball : फुटबॉल इतिहासातील ५ अजरामर बॉल; ज्यांनी बदलली खेळाची दिशा!

फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंचे कौशल्य जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्वाचे असते तो 'बॉल'. तंत्रज्ञान आणि

'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच