Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राला हायकोर्टाचा मोठा दिलासा

बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे दिले आदेश


पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने (Pune Porsche Accident) अख्खा महाराष्ट्र तापला होता. हा मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशी कामाला लागली आहे, याची वारंवार उदाहरणे समोर येत होती. त्यातच आता या धनिकपुत्राला मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामागील कारणही समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जामीनानंतर पुणे पोलिसांनी मुलाला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायलयाने म्हटलं. मुलाची आत्या पूजा जैन हिने काही दिवसांपूर्वी हेबियस कॉर्पसअंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली असून मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. मुलाचे आई, वडील आणि आजोबा हे सध्या पोलीसांच्या कोठडीत आहेत. त्यामुळे मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.



आत्याने याचिका का केली?


कोर्टाने जामीन दिल्यानंतरही मुलाला अटक करण्यात आली. इथे सरळसरळ कायद्याच्या मर्यादेबाहेर जात कोर्टाने अटकेचे आदेश दिले आहेत. मुलगा १७ वर्षे ८ महिन्यांचा आहे, त्यामुळे अल्पवयीनच आहे यात दुमत नाही. सध्या त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तिथे मुलाची नीट काळजी घेतली जात नसून तिथे त्याच्या जीवालाही धोका आहे. बालसुधारगृहाबाबत अनेक तक्रारी आहेत. मुलाचे आई- वडील, आजोबा सारेजण सध्या कोठडीत आहेत. याप्रकरणी दाद मागणाराच कुणी नाही, म्हणून आत्याच्या वतीने ही याचिका करण्यात आली.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील