चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनी कडून शेतकऱ्यांची फसवणूक, शेतीचे पंचनामे करून पण नुकसान भरपाई नाही

दोन जुलै पासून उपोषणचा इशारा


पेण(देवा पेरवी )- काही वर्षां पूर्वी पासून मोदी सरकार ने एक रुपायात पिक विम्याची घोषणा केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. या घोषणेनंतर बळीराजाने चोला मंडळ विमा कंपनीकडून आपल्या शेतीचा २०२३ रोजी विमा उतरविला होता. मागील वर्षात अतीवृष्टी मुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांनी शेतातील पिकाची कापणी केली असताना अती पावसामुळे पुर्ण पिक वाया जावुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनीने शेतीचे रीतसर पंचनामे करून देखील नुकसान भरपाई न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. येत्या १ जुलै पर्यंत संपूर्ण नुकसान भरपाई न मिळाल्यास 2 जुलै रोजी पासून शेतकरी तीव्र आंदोलन करत उपोषण करणार आहेत.


२०२३ च्या विमा धारक शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानाची रितसर तक्रार चोला मंडळ एम.यस. इन्श्युरन्स कंपनी कडे 24 तासाच्या आत केली होती. त्या नुसार सदर शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुद्धा रीतसर झाले होते. परंतु आज पर्यत फक्त २० टक्के शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले तेही तुरळक प्रमाणात शेतकऱ्यांची चेष्टा केल्या प्रमाणे. जर का सरकारने १ रुपयात शेतकऱ्यांना विमा दिला असेल पण सरकारने विमा कंपनीला सर्व शेतकऱ्यांच्या विम्याचे देय रक्कम विमा कंपनीला जमा केले आहेत. मग बळीराजाला नुकसान भरपाई देण्यात चोला मंडळ दिरंगाई का करत आहे.


शेतकऱ्यांने शेतीचा विमा उतरवून एक वर्ष झाले पंरतु आज पर्यत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने पेण खारेपाट विभागातील बळीराजाने पेण येथील तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. तसेच येत्या एक तारखे पर्यन्त नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाले तर दोन जुलै रोजी पासून कृषी अधिकारी पेण कार्यालया समोर चोला मंडळ एम.एस. इन्श्युरन्स कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करत उपोषण करणार असल्याचा इशारा संपूर्ण शेतकरी वर्गाने दिला आहे.


raसंबधित चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनी बरोबर विमा बद्दल पत्र व्यवहार करून तसेच चौकशी करुन व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी बोलुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. - सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी-पेण

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार