वाहत्या नदीवर ४८ तासांत उभारला पूल; उत्तर सिक्कीममध्ये लष्करी अभियंत्यांचे कौशल्य पणाला

नवी दिल्ली : सिक्कीममध्ये गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार उडविला होता. राज्यातील काही भागांचा संपर्क तुटला होता. उत्तर सिक्कीममध्ये अडकलेले हजारो पर्यटक आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने तातडीने मदतकार्य सुरू केले होते. भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवर १५० फूट लांबीचा झुलता पूल ४८ तासांत यशस्वीपणे बांधला. लष्कराने २० नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या पाण्यावर झुलता पूल उभारण्यास सुरुवात केली होती.


सततच्या मुसळधार पावसामुळे तुटलेल्या सीमावर्ती गावांशी या पुलामुळे पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. लष्कराने २० नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या पाण्यावर झुलता पूल उभारण्यास सुरुवात केली होती आणि हे संपूर्ण काम अवघ्या ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले. या पुलाचे बांधकाम अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आले. प्रतिकूल हवामान आणि वेगाने वाहणारे पाणी असूनही भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी त्यांच्या तांत्रिक प्रावीण्य पणाला लावले,’ असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रेस निवेदनात म्हटले आहे.


मंत्रालयाने शेअर केलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये वेगाने वाहणाऱ्या नदीवरील पुलाचे अंतिम टप्प्यातील काम लष्करी अभियंते करीत असल्याचे दिसत होते. नव्याने बांधण्यात आलेला झुलता पूल हा संपर्क तुटलेल्या भागाला जोडण्याबरोबरच लोकांची ये-जा आणि बाधितांना आवश्यक मदत सामग्री पुरविण्यासाठीही उपयुक्त ठरल्याचे निवेदनात म्हटले आहे. या कठीण काळात या सीमावर्ती गावांतील रहिवाशांना आवश्यक साधने व आधार देण्यासाठी हा पूल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.


उत्तर सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे स्थानिक लोकांनी आधार देण्याचे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. गरजेच्या वेळी ताकद देणारा आधारस्तंभ, ही लष्कराची ओळख पुन्हा दृढ झाली, असेही लष्करी निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा