Success Mantra: दररोज करा ही ५ कामे, बदलून जाईल तुमचे जीवन

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुढे जायचे असते. या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या दिनचर्येचा आपल्या जीवनावर गहन परिणाम होतो. तुमच्या रूटीनमध्ये तुम्ही छोटे छोटे बदल करून तुम्ही जीवनात मोठा बदल घडवून आणू शकता. जाणून घ्या कोणती अशी कामे आहेत जी तुम्ही दररोज केली पाहिजे.

आभार व्यक्त करा


दर दिवशी काही मिनिटे जे काही तुम्हाला मिळाले आहे त्याबद्दल विचार करा आणि आभार माना. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे आभार माना. चांगले आरोग्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना. यामुळे मूड नेहमी चांगला राहतो. तसेच तणाव कमी होतो.

एक्सरसाईज करा


नियमित व्यायामामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. व्यायामामुळे हृदय, फुफ्फुसे आणि मांसपेशी मजबूत होतात. वजन कमी करण्यास मदत होते. मूड चांगला बनतो आणि तणाव कमी होतो. दररोज ३० मिनिटे एक्सरसाईज करा.

चांगले जेवण करा


आपण जे खात असतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आपल्या डाएटमध्ये ताजी फळे, भाज्या, अख्खे धान्य तसेच अधिकाधिक प्रोटीनचा समावेश करा. प्रोसेस्ड फूड, साखर आणि फॅटी पदार्थ खाऊ नका.

पुरेशी झोप घ्या


जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शरीर आणि मेंदू रिचार्ज होतो. प्रत्येकाला रात्रीच्या वेळेस कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. वेळेवर झोपण्याची तसेच वेळेवर उठण्याची सवय लावा.

मजेशीर अॅक्टिव्हिटी करा


दरदिवशी काहीतरी मजेशीर अॅक्टिव्हिटी करा. जसे की वाचणे, संगीत ऐकणे, फिरणे अथवा मित्र-कुटुंबासोबत वेळ घालवणे. असे केल्याने तुम्हाला आनंद भेटेल.
Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी