मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुढे जायचे असते. या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या दिनचर्येचा आपल्या जीवनावर गहन परिणाम होतो. तुमच्या रूटीनमध्ये तुम्ही छोटे छोटे बदल करून तुम्ही जीवनात मोठा बदल घडवून आणू शकता. जाणून घ्या कोणती अशी कामे आहेत जी तुम्ही दररोज केली पाहिजे.
दर दिवशी काही मिनिटे जे काही तुम्हाला मिळाले आहे त्याबद्दल विचार करा आणि आभार माना. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे आभार माना. चांगले आरोग्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना. यामुळे मूड नेहमी चांगला राहतो. तसेच तणाव कमी होतो.
नियमित व्यायामामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. व्यायामामुळे हृदय, फुफ्फुसे आणि मांसपेशी मजबूत होतात. वजन कमी करण्यास मदत होते. मूड चांगला बनतो आणि तणाव कमी होतो. दररोज ३० मिनिटे एक्सरसाईज करा.
आपण जे खात असतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आपल्या डाएटमध्ये ताजी फळे, भाज्या, अख्खे धान्य तसेच अधिकाधिक प्रोटीनचा समावेश करा. प्रोसेस्ड फूड, साखर आणि फॅटी पदार्थ खाऊ नका.
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शरीर आणि मेंदू रिचार्ज होतो. प्रत्येकाला रात्रीच्या वेळेस कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. वेळेवर झोपण्याची तसेच वेळेवर उठण्याची सवय लावा.
दरदिवशी काहीतरी मजेशीर अॅक्टिव्हिटी करा. जसे की वाचणे, संगीत ऐकणे, फिरणे अथवा मित्र-कुटुंबासोबत वेळ घालवणे. असे केल्याने तुम्हाला आनंद भेटेल.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…