Credit Card : क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे पडणार महागात!

१ जुलैपासून 'हा' नवा नियम लागू होणार


मुंबई : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकार मोठे बदल करत असते. त्यातच जून महिन्याचा अखेर जवळ आला असून आरबीआयकडून (RBI) मोठे बदल होणार आहेत. क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आरबीआयच्या नियमानुसार, १ जुलैपासून क्रेडिट कार्डसंदर्भात नवा नियम जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना कार्डद्वारे बिल भरणे महाग पडणार असल्याचे म्हटले जात आहे.


मिळालेल्या महितीनुसार, १ जुलैपासून, सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही सिस्टीम आणली आहे. त्यामुळे या नव्या नियमांचा परिणाम फोन पे, क्रेड, बिलडेस्क, इन्फिबिन यांसारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे.



तीन महिन्यांचा वेळ द्या


१ जुलैपासून लागू होणारा नवा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे. देशभरात एकूण ३४ बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. परंतु आतापर्यंत यातील केवळ ८ बँकानी बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे. त्यामुळे वेळ वाढवून देणे गरजेचे आहे, असे बँकांनी म्हटले आहे.



काय अडचण येईल?


एचडीएफसी (HDFC) बँकेने आतापर्यंत २ कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. आयसीआयसीआय (ICICI) बँकेने १.७ कोटी क्रेडिट कार्ड जारी केलेले आहेत. तर अ‍ॅक्सिस (Axis Bank) बँकेचे एकूण १.४ कोटी क्रेडिट कार्ड आहेत. मात्र या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. त्यामुळे फोन पे, क्रेड, तसेच अन्य अ पवरून या बँकांच्या क्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या अ‍ॅपच्या मदतीने क्रेडिट कार्डचे बील भरता येणार नाही.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन