Onion Prices: ग्राहकवर्गाला कांदा आता नाही रडवणार! सरकारने खरेदी केला हजारो टन स्टॉक

मुंबई: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किंमतीवर आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने बफर स्टॉकसाठी तब्बल ७१ हजार टन कांदा विकत घेतला आहे. कांद्यांच्या किंमतीने ४० रूपये प्रति किलोचा आकडा पार केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कांद्यांची घाऊक किंमत शुक्रवारी ३८.६७ रूपये किलो इतकी होती. सरकारला आशा आहे की येणाऱ्या काळात कांद्यांच्या वाढत्या किंमतीपासून दिलासा मिळेल.



यावर्षी ५ लाख टन खरेदीची तयारी


सरकारने किंमती स्थिर राखण्यासाठी या वर्षी ५ लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारला आशा आहे की देशातील अधिकांश भागात मान्सून वाढण्यासोबतच रिटेल किंमतीही कमी होतील.


याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० जूनपर्यंत केंद्र सरकारने बफर स्टॉक म्हणून ७०,९८७ टन कांदा खरेदी केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७४,०७१ टन कांदा खरेदी करण्यात आला होता.



भीषण उन्हाळा आणि पावसामुळे उत्पादन घटल्याची शंका


यावर्षी भीषण उन्हाळा आणि कमी पावसामुळे रबी पिकांच्या उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. कांद्यांच्या वाढत्या किंमतीला हेच कारण जबाबदार आहे. त्यामुळेच या वर्षीही कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यास वेग आला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार या बफर स्टॉकचा वापर करेल. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार गेल्या ऑगस्टपासून पावले उचलत आहे. याआधी ४० टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावण्यात आली.

Comments
Add Comment

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक

BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर,

Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक

NEET-UG 2026 : पेपरफुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली, आता पुढे काय होणार ?

नवी दिल्ली : पेपरफुटी झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी रविवार ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली 'नीट' (NEET-UG

NEET UG 2026 : 'नीट' पेपर फुटीचं केरळ कनेक्शन! ४२ तास आधीच फुटला होता पेपर; परीक्षा अखेर रद्द; सीबीआय करणार चौकशी

२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक

Assam Himanta Biswa Sarma Oath : आसाममध्ये पुन्हा 'बिस्वा'राज! हिमंत बिस्वा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुवाहाटी : आसामच्या राजकीय इतिहासात मंगळवारी (१२ मे) एका नव्या पर्वाची नोंद झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता