Laxmikant Dixit : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अनेक दिवसांपासून आजारी; वाराणसीमध्ये सुरु होते उपचार


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांचे आज सकाळी पावणेसात वाजता निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर वाराणसीमध्ये (Varanasi) उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने काशीसह (Kashi) संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.


पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांच्या मंगळागुरी या निवासस्थानापासून सुरू होणार आहे. तर त्यांच्या पार्थिवावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



कोण होते लक्ष्मीकांत दीक्षित?


रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात लक्ष्मीकांत यांचा पुजाऱ्यांच्या संघात समावेश होता. राम मंदिराच्या अभिषेकात त्यांनी १२१ पुरोहितांचे नेतृत्व केले होते. लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महावि‌द्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते. त्यांना काशीतील यजुर्वेदाचे महान विद्वान म्हणून ओळखले जात होते. त्यांची भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेवर नितांत श्रद्धा होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही दीक्षित घराण्याच्या जुन्या पिढ्यांचे योगदान असल्याचे सांगितले जाते.



उपासना पद्धतीतही पारंगत


लक्ष्मीकांत दीक्षित हे यजुर्वेदाचे उत्तम अभ्यासक असण्यासोबतच उपासना पद्धतीचेही जाणकार मानले जात होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी काशी येथे स्थायिक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती.

Comments
Add Comment

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात