उशिरा येऊन, लवकर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारचे नवे निर्देश

Share

नवी दिल्ली : उशिरा येऊन, लवकर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी रजिस्टर हजेरी न लावता केवळ बायोमेट्रिक हजेरी लावावी, असे निर्देश दिले आहेत. कोरोना काळानंतर अनेक कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी लावत नव्हते. त्यावर आता केंद्रीय विभागाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

सरकारी कार्यालयात कर्मचारी जागेवर हजर नाहीत, असा अनुभव अनेकांना येतो. सकाळी वेळेवर कर्मचारी कधीच हजर होत नाहीत. संध्याकाळी निघण्याचीही त्यांना खूप घाई झालेली असते. यामुळे वेळेवर न येणाऱ्या आणि लवकर पळ काढणा-या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्राच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने आता नवे निर्देश काढले आहेत. त्यानुसार, देशभरातील केंद्र सरकारच्या कार्यालयातील सर्व ज्येष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी ९.१५ पर्यंत कार्यालयात हजर व्हावे आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी, असे आदेश देण्यात आले आहेत. जर विहित वेळेत कर्मचारी कार्यालयात हजर झाले नाहीत, तर त्यांचा हाफ डे लावण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

कोरोना काळानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावणे बंद केले आहे, ही बाब निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी रजिस्टरमध्ये हजेरी न लावता केवळ बायोमेट्रिक हजेरी लावावी, असेही बजावण्यात आले आहे. “जर काही कारणांमुळे कर्मचारी कार्यालयात एखाद दिवशी हजर राहू शकले नाहीत. तर त्यांनी वरिष्ठांना त्याबद्दल माहिती देऊन सुट्टीसाठी अर्ज करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांचा हजेरीपट आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल अधिक जागरूक असण्याची अपेक्षा यात व्यक्त केली गेली आहे. केंद्र सरकारची बहुतेक कार्यालये ही सकाळी ९ पासून सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यरत असतात. मात्र अनेक कर्मचारी हे उशीरा येऊन लवकर घरी जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. थेट लोकांशी संबंधित असलेल्या विभागातील कर्मचारीही गंभीर नसल्यामुळे केंद्र सरकारने आता कडक पाऊल उचलले आहे.

Recent Posts

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

16 minutes ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

20 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

2 hours ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

2 hours ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

2 hours ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago