नवी दिल्ली : नीट परीक्षेतील घोटाळ्याबाबत देशभरात निदर्शने सुरू असून, सरकारने नीट परीक्षा रद्द करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यात आता शिक्षण मंत्रालयाने देशातील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती जाहीर केली आहे. या समितीचे नेतृत्त्व माजी इस्त्रो प्रमूख डॉ. के राधाकृष्णन (Former Istro chief Dr. K Radhakrishnan) करणार असून, या समितीत एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया आणि अन्य सदस्यांचा समावेश आहे.
ही समिती परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी काम करणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करणे, डेटा सुरक्षा मजबूत करणे आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कामकाजावर शिफारशी सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. ही समिती त्यांचा अहवाल २ महिन्यांच्या आत शिक्षण मंत्रालयाला सादर करणार असून, ज्यामध्ये परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि प्रक्रिया न्याय्य करण्यासाठी उपाययोजनांचा समावेश असेल असे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…
पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…
मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…
पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…
देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…
मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…