Monsoon Trip : मुंबईच्या वनराईत दडलेल्या धबधब्यांची गोष्टच न्यारी! वनडे पिकनिकसाठी ‘हे’ आहेत भन्नाट पर्याय

Share

मुंबई : पावसाळा सुरु झाला की, पावसाची खरी मजा अनुभवण्यासाठी तमाम पिकनिक लव्हर्सची पाऊले धबधब्यांकडे वळतात. तसे महाराष्ट्रात बरेच प्रसिद्ध धबधबे आहेत. मात्र कॉलेज विद्यार्थ्यांसह अनके जणांना मुंबईतील धावत्या लाईफमुळे मुंबईबाहेर एक दिवस फिरायला जाणे शक्य नसते. अशा वेळी ते मुंबईपासून जवळ असलेल्या धबधब्यांची निवड करतात.

आम्ही तुम्हाला मुंबईतील अशाच काही पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत. जी तुम्हाला एक दिवसीय पिकनीकसाठी उत्तम ठरु शकतात. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

भिवपुरी धबधबा (Bhivpuri Waterfall)

कर्जतमध्ये मुंबईपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर वसलेला भिवपुरी धबधबा हा खडकावरून पाण्याचा मंत्रमुग्ध करणारा धबधबा आहे. आश्चर्यकारक परिसर आणि हिरवाईने वसलेला हा धबधबा या प्रदेशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

आषाणे धबधबा (दूधसागर)

कर्जत रेल्वे स्थानकावरील अलीकडच्या भिवपुरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध आषाणे धबधबा (Ashane Waterfall) आहे. दूर डोंगरात अगदी दुधासारखा पांढऱ्या रंगाचा फेसाळणारा या धबधब्याला ‘दूधसागर’ देखील म्हटले जाते. भिवपुरी स्थानकापासून केवळ अर्ध्या तासात या धबधब्यापर्यंत पोहोचता येते. मात्र या धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता आणि सभोवतालचा परिसर हिरवागार आणि आल्हादायक वातावरणामुळे याठिकाणी पावसाच्या वेळी नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

पांडवकडा धबधबा (Pandavkada Waterfall)

पांडवकडा धबधबा ही खारघरची (Kharghar) विशेष ओळख आहे. टेकड्यांनी वेढलेला पांडवकडा धबधबा हा त्याच्या सौंदर्याच्या आकर्षणासाठी ओळखला जातो. हे ठिकाण मुख्य शहरापासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. मुंबईकरांसाठी हे एक लोकप्रिय आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इत्यादी शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेला या उथळ तलावात कोसळणाऱ्या चित्तथरारक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात.

चिंचोटी धबधबा (Chinchoti Waterfall)

वसईच्या नायगावजवळ असलेला चिंचोटी धबधबा, मुंबईजवळील सर्वोत्तम धबधब्याच्या यादीतील आणखी एक आश्चर्यकारक ठिकाण आहे. हा १०० फूट उंच धबधबा आहे. पर्यटकांना या धबधब्याला भेट द्यायची असल्यास जून ते ऑक्टोबर हा कालावधीत सर्वोत्तम आहे. या ठिकाणी अनेकजण ट्रेकिंगच्या सहलीसाठी जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांना जवळून साइटचे सौंदर्य स्वीकारण्यात मदत होऊ शकते.

दाभोसा धबधबा (Dabhosa Waterfall)

दाभोसा हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील, जव्हार तालुक्यामधील एक बारमाही धबधबा आहे. सुमारे ३०० फूट उंचीचा हा धबधबा जव्हारपासून २० किमी अतरांवर आहे आणि मुंबई पासून १५० किमी अंतरावर आहे. हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत कड्यावरून कोसळणारी दाभोसाची पांढराशुभ्र धारा पाहणे हा पर्यटकांसाठी खरोखरच अनोखा अनुभव असतो.

धनगर धबधबा (Dhangar Waterfall)

पावसाळ्यात मुंबई जवळ एक दिवसाचा पिकनिक प्लॅन करत असाल, आणि एका भन्नाट धबधव्याला भेट द्यायची असेल, तर बदलापूर येथील धनगर धबधबा हा सर्वात उत्तम पर्याय ठरु शकतो. धनगर धबधबा हा बदलापूर रेल्वे स्थानकाहून अर्ध्यातासाच्या अंतरावर आहे. त्यासोबत या धनगर वॉटरफॉलजवळ पाहण्यासारखी ओढा, कोंडेश्वर मंदिर, मलंगगड ची डोंगर रांग अशी अनेक ठिकाण आहेत. त्यामुळे कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत फिरायचा बेत आखत असाल तर अशा सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणाला नक्कीच भेट द्या.

भगीरथ धबधबा (Bhagirath WaterFall)

भगीरथ धबधबा, ज्याला भांगणी धबधबा असेही म्हणतात. हा मुंबईजवळील एक गुप्त धबधबा आहे. ही एक नेत्रदीपक साइट आहे जी अद्याप पूर्णपणे एक्सप्लोर केलेली नाही. त्यामुळे, दर्जेदार वेळ घालवण्यासाठी, अभ्यागतांना त्यांच्या संवेदना पुनरुज्जीवित करण्यात आणि शांततेचा क्षण घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. हा धबधबा वांगणी रेल्वेस्थानकापासून ३ किमी अंतरावर आहे. ज्या लोकांना आउटडोअर ॲक्टिव्हिटी करायला आवडतात त्यांच्यासाठी मुंबईजवळ एक दिवसीय पिकनिक आणि धबधबा ट्रेकसाठी हे सर्वात अनुकूल ठिकाण मानले जाते.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

11 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

31 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago