Heat Wave : मृत्यूचे तांडव! माणसांसह पक्षीही ठरले उष्माघाताचे बळी

नवी दिल्ली : देशातील काही राज्यात पावसाचे (Monsoon) आगमन झाले आहे. मात्र अजूनही काही भागात नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. जून महिन्याचा अखेर जवळ आला तरीही यंदा ऋतु चक्रात बदल झाल्याने पावसाची हवी तशी हजेरी लागल्याचे दिसून येत नाही. याचा फटका मानवी आयुष्यासह बऱ्याच पक्ष्यांना बसत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने निशाचर असलेले वटवाघूळ पक्षी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. परंतु तीव्र उष्णतेमुळे कानपूर येथे मोठ्या प्रमाणात वटवाघूळ मृत अवस्थेत आढळून आले आहेत. तर दिल्लीतही २४ तासांत २२ जण उष्माघाताचे बळी ठरल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.



उष्णतेने वटवाघुळांचा झपाट्याने मृत्यू


उत्तर भारतात मैदानी पट्टा असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट जाणवते. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा केले होते. मात्र या उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांसह पक्ष्यांनासुद्धा करावा लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे कानापुरातील नाना राव पार्कमध्ये उष्णतेचा तडाका सहन न झाल्याने वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे. साधारण १०० हून अधिक वटवाघुळांची मृत शरीरे नाना राव पार्कमध्ये आढळून आली. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघुळांच्या शरीराचे अवशेष पडल्याने रोगराई पसरेल अशी चिंता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



दिल्लीत २४ तासांत २२ जणांचा मृत्यू


दिल्ली येथील राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) आणि सफदरजंग या तीन रुग्णालयांत गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सफदरजंग रुग्णालयात उष्णतेमुळे त्रस्त ३३ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. ‘एलएनजेपी’ या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १७ पैकी पाच रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. तर, ‘आरएमएल’ रुग्णालयात गेल्या २४ तासांत उष्माघाताचे २२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.


दरम्यान, सततच्या बदलत्या ऋतु चक्राचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि धोक्यात येणारे मानवी जीवन असे बरेच प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले आहेत. तर प्रशासनाने याबाबत काही हालचाल करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पूर्व युरोप दौरा, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १९ ते २५ जुलै या कालावधीत मोल्दोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन

Supreme Court Verdict : मृतदेह सापडला नाही तरी सिद्ध होणार खुनाचा गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली : एखाद्या खुनाच्या प्रकरणात मृतदेह सापडला नाही, तर आरोपी निर्दोष सुटू शकत नाही, असा अत्यंत महत्त्वाचा

Skyroot Aerospace : भारताचे पहिले खासगी रॉकेट 'विक्रम-१' प्रक्षेपणासाठी सज्ज

नवी दिल्ली : सिंगापूरच्या उच्चायुक्तालयाने शुक्रवारी स्काय-रूट एरोस्पेसच्या ( Skyroot Aerospace) 'विक्रम-१' मोहिमेला

Indian Navy: भारतीय नौदलाच्या ताफ्यात 'सीहॉक' हेलिकॉप्टर

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एक 'एमएच-६०आर सीहॉक' नौदल हेलिकॉप्टर दाखल झाले आहे, अशी माहिती अमेरिकन

Supreme Court : नागरिकत्व ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण

नवी दिल्ली : मतदार यादीत नाव नसल्यामुळे किंवा पुनरीक्षणादरम्यान नाव वगळल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे भारतीय

Corona Alert : देशामध्ये कोरोनाचे ३३९ रुग्ण; केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूत आरोग्य विभाग सतर्क

नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत अंदाजे ३३९ रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ११५ रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल