‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’

८२ हजार १०३ ग्रामस्थांना आजही टँकरच्या पाण्याचा दिलासा


ठाणे : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस झाले. काळे ढग येतात, आकाश अंधारून येते, पाऊस मात्र पडत नाही, ढग मात्र निघून जातात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अजूनपर्यंत दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना ‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’ असा टाहो फोडण्याची आता वेळ आलेली आहे. जून महिना अर्धा लोटला तरी जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही ४८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.


जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीवघेणी पाणीटंचाई जूनचा अर्धा महिना संपला तरी कायम आहे. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ मोठ्या लोकवस्तीच्या गावांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.


शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. मुरबाड तालुक्यातील १७ मोठी लोकवस्तीची गावे आणि १८ पाड्यांसाठी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुरबाडमधील ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टँकरने १ लाख १ हजार ७०७ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली