‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’

  39

८२ हजार १०३ ग्रामस्थांना आजही टँकरच्या पाण्याचा दिलासा


ठाणे : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस झाले. काळे ढग येतात, आकाश अंधारून येते, पाऊस मात्र पडत नाही, ढग मात्र निघून जातात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अजूनपर्यंत दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना ‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’ असा टाहो फोडण्याची आता वेळ आलेली आहे. जून महिना अर्धा लोटला तरी जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही ४८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.


जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीवघेणी पाणीटंचाई जूनचा अर्धा महिना संपला तरी कायम आहे. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ मोठ्या लोकवस्तीच्या गावांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.


शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. मुरबाड तालुक्यातील १७ मोठी लोकवस्तीची गावे आणि १८ पाड्यांसाठी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुरबाडमधील ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टँकरने १ लाख १ हजार ७०७ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार