ठाणे : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस झाले. काळे ढग येतात, आकाश अंधारून येते, पाऊस मात्र पडत नाही, ढग मात्र निघून जातात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अजूनपर्यंत दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना ‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’ असा टाहो फोडण्याची आता वेळ आलेली आहे. जून महिना अर्धा लोटला तरी जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही ४८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीवघेणी पाणीटंचाई जूनचा अर्धा महिना संपला तरी कायम आहे. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ मोठ्या लोकवस्तीच्या गावांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.
शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. मुरबाड तालुक्यातील १७ मोठी लोकवस्तीची गावे आणि १८ पाड्यांसाठी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुरबाडमधील ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टँकरने १ लाख १ हजार ७०७ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात आला होता.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…