IND vs ZIM: पुढील आठवड्यात टीम इंडियाची घोषणा!झिम्बाब्वेसोबत होणार मालिका

Share

मुंबई: आता टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) संपलेला नाही मात्र भारताने जर ट्रॉफी जिंकली तर त्यांचे लक्ष झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेवर असेल. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ टी-२० सामने खेळवले जातील. आता एका मीडिया रिपोर्टनुसार झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

दरम्यान, लवकरच भारताला नवा प्रशिक्षक मिळमार आहे. अशातच मुख्य निवडप्रमुख अजित आगरकर या प्रकरणात कोचचा सल्लाही घेतील. असे सांगितले जात आहे की झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

रिपोर्ट्सनुसार टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला नवी सुरूवात दिली जाऊ शकते. आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना १५ सदस्यीय संघात निवडले जाऊ शकते. दरम्यान, या विषयावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. जर नव्या कोचच्या निवड प्रक्रियेत थोडाही उशीर झाला तर पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली जाऊ शकते.

वरिष्ठ खेळाडूंना आराम

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माशिवाय विराट कोहलीलाही आराम दिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आराम दिला जाऊ शकतो. अशातच मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल असा सवाल आहे. ऋतुराजकडे टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

10 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

11 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

12 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

12 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

13 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

13 hours ago