IND vs ZIM: पुढील आठवड्यात टीम इंडियाची घोषणा!झिम्बाब्वेसोबत होणार मालिका

मुंबई: आता टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) संपलेला नाही मात्र भारताने जर ट्रॉफी जिंकली तर त्यांचे लक्ष झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेवर असेल. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ टी-२० सामने खेळवले जातील. आता एका मीडिया रिपोर्टनुसार झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.


दरम्यान, लवकरच भारताला नवा प्रशिक्षक मिळमार आहे. अशातच मुख्य निवडप्रमुख अजित आगरकर या प्रकरणात कोचचा सल्लाही घेतील. असे सांगितले जात आहे की झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.


रिपोर्ट्सनुसार टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला नवी सुरूवात दिली जाऊ शकते. आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना १५ सदस्यीय संघात निवडले जाऊ शकते. दरम्यान, या विषयावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. जर नव्या कोचच्या निवड प्रक्रियेत थोडाही उशीर झाला तर पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली जाऊ शकते.



वरिष्ठ खेळाडूंना आराम


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माशिवाय विराट कोहलीलाही आराम दिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आराम दिला जाऊ शकतो. अशातच मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल असा सवाल आहे. ऋतुराजकडे टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20

IPL 2026 : हंगामाच्या मध्यावर सनरायझर्सला मिळणार पॅट कमिन्सची साथ ?

मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू

Team India's Match Schedule : क्रिकेटचा मेगा सीझन! बीसीसीआयकडून भारतीय संघाचं २०२६-२७ चं वेळापत्रक जाहीर

- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२