IND vs ZIM: पुढील आठवड्यात टीम इंडियाची घोषणा!झिम्बाब्वेसोबत होणार मालिका

  66

मुंबई: आता टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) संपलेला नाही मात्र भारताने जर ट्रॉफी जिंकली तर त्यांचे लक्ष झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेवर असेल. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ टी-२० सामने खेळवले जातील. आता एका मीडिया रिपोर्टनुसार झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.


दरम्यान, लवकरच भारताला नवा प्रशिक्षक मिळमार आहे. अशातच मुख्य निवडप्रमुख अजित आगरकर या प्रकरणात कोचचा सल्लाही घेतील. असे सांगितले जात आहे की झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.


रिपोर्ट्सनुसार टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला नवी सुरूवात दिली जाऊ शकते. आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना १५ सदस्यीय संघात निवडले जाऊ शकते. दरम्यान, या विषयावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. जर नव्या कोचच्या निवड प्रक्रियेत थोडाही उशीर झाला तर पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली जाऊ शकते.



वरिष्ठ खेळाडूंना आराम


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माशिवाय विराट कोहलीलाही आराम दिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आराम दिला जाऊ शकतो. अशातच मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल असा सवाल आहे. ऋतुराजकडे टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार