शालेय बसला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरचा अपघात

Share

चारचाकी कार, दोन दुचाकी यांना धडकून एका दुकानात प्रवेश

एक महिला जागीच ठार, तीन विद्यार्थी जखमी

पुणे : मावळ येथील मातोश्री हॉस्पिटल, कुडे वाडा जवळ मुंबई पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने आलेला कंटेनर सर्व्हिस रस्त्याकडे घुसला आणि त्याठिकाणी उभी असलेली महीला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली तर तीन विद्यार्थी जखमी झाली.

लता रणजित जाधव (वय ४१, रा. कुडे वाडा वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून संदीप झालटे (वय ४०, रा.दिग्विजय कॉलनी, वडगाव), सृष्टी भाटेकर (वय ११, रा.केशवनगर, वडगाव), मैत्रीय भवार (वय १४), मृणाल भवार (वय १४, दोघे रा.दिग्विजय कॉलनी) हे चार जण जखमी झाले आहेत.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार कुडेवाडा बस स्टॉपवर नेहमीप्रमाणे महिला, विद्यार्थी व नागरिक थांबले होते. सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी महामार्गाच्या कडेला एक शाळेची बस उभी होती, दरम्यान मुंबईहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर (एम एच ४६ बी एफ ९१५७) हा पुढे उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रस्त्याकडे वळला व त्याठिकाणी असलेल्या चारचाकी कार, दोन दुचाकी यांना धडकून एका दुकानात घुसला.

दरम्यान या अपघातात सर्व्हिस रस्त्यावर उभी असलेली महीला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली, तर शाळकरी मुले जखमी झाली आहेत. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर उचलून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

10 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

11 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

11 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

12 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

13 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

13 hours ago