Water Crisis : दिल्लीत पाणीबाणी! पाण्यासाठी नागरिकांची झुंबड

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असली तरीही देशातील अनेक राज्यातील नागरिकांना अजूनही उष्णतेच्या लाटा (Heat Wave) सोसाव्या लागत आहेत. एकीकडे प्रचंड उकाड्यामुळे काहिली होत असताना दुसरीकडे भीषण पाणीटंचाईला (Water shortage) सामोरे जावे लागत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथेही नागरिकांना अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील गीता कॉलनी, वसंत विहार, ओखला अशा अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. या भागातील जलसंकटामुळे स्थानिक नागरिक चिंतेत पडले आहेत. या विभागात टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. दिल्लीतील स्थानिक लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे वसंत विहार परिसरातील कुसुमपूर पहाडी येथील लोकांनाही पाणी संकटाचा सामना करावा लागत असून ते टँकरवर अवलंबून दिवस काढत आहेत.


दरम्यान, पाणीटंचाई क्षेत्राजवळ टँकर येताच नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडत आहे. पाऊस पडल्यानंतर पाणीटंचाईची परिस्थिती सुधारु शकते असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उन्हामुळे हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

'Jag Vikram' LPG Ship : होर्मुज तणावात दिलासा; ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल

होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’

Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ.

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान

Vedanta plant in Chhattisgarh : छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; १४ कामगारांचा मृत्यू, १९ गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता

ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील