T20 Hundred:२७ बॉलमध्ये शतक, मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

मुंबई: टी-२० क्रिकेटम(t-20 cricket) अनेक क्रिकेटर आपल्या तुफानी अंदाजात शतक झळकवत असतात. आतापर्यंत प्रोफेशनल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड क्रिस गेलच्या नावावर होता. ज्याने आयपीएल २०१३मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ३० बॉलमध्ये शतक पूर्ण केले होते. आता एस्टोनियासाठी खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडू साहिल चौहानने केवळ २७ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला.


एस्टोनिया सध्या सायप्रसचा दौरा करत आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ६ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत या २ सामन्यांमध्ये एस्टोनियाने विजय मिळवला आहे.



मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड


टी-२० क्रिकेटमध्ये क्रिस गेलने ३० चेंडूत शतक ठोकले होते. आता १७ जूनला एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला गेला. यात यजमान सायप्रसने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ विकेट गमावताना १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल एस्टोनियाने ९ धावांवर आपले पहिले २ विकेट गमावले. मात्र साहिल चौहान फलंदाजीसाठी आला आणि येताच त्याने चौकार-षटकारांचा पाऊस सुरू केला. चौहानने २७ बॉलमध्ये शतक पूर्ण केले. संपूर्ण सामन्यात त्याने ४१ बॉलमध्ये १४४ धावा ठोकल्या. यात त्याने १८ षटकार आणि ६ चौकार लगावले.



कोणत्या भारतीयाच्या नावावर आहे वेगवान शतक


टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये ऋषभ पंतचे नाव आहे. २०१८मध्ये आपल्या डोमेस्टिक करिअरदरम्यान दिल्लीसाठी खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध ३२ बॉलमध्ये शतक ठोकले होते.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे