T20 Hundred:२७ बॉलमध्ये शतक, मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

मुंबई: टी-२० क्रिकेटम(t-20 cricket) अनेक क्रिकेटर आपल्या तुफानी अंदाजात शतक झळकवत असतात. आतापर्यंत प्रोफेशनल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड क्रिस गेलच्या नावावर होता. ज्याने आयपीएल २०१३मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ३० बॉलमध्ये शतक पूर्ण केले होते. आता एस्टोनियासाठी खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडू साहिल चौहानने केवळ २७ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला.


एस्टोनिया सध्या सायप्रसचा दौरा करत आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ६ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत या २ सामन्यांमध्ये एस्टोनियाने विजय मिळवला आहे.



मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड


टी-२० क्रिकेटमध्ये क्रिस गेलने ३० चेंडूत शतक ठोकले होते. आता १७ जूनला एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला गेला. यात यजमान सायप्रसने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ विकेट गमावताना १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल एस्टोनियाने ९ धावांवर आपले पहिले २ विकेट गमावले. मात्र साहिल चौहान फलंदाजीसाठी आला आणि येताच त्याने चौकार-षटकारांचा पाऊस सुरू केला. चौहानने २७ बॉलमध्ये शतक पूर्ण केले. संपूर्ण सामन्यात त्याने ४१ बॉलमध्ये १४४ धावा ठोकल्या. यात त्याने १८ षटकार आणि ६ चौकार लगावले.



कोणत्या भारतीयाच्या नावावर आहे वेगवान शतक


टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये ऋषभ पंतचे नाव आहे. २०१८मध्ये आपल्या डोमेस्टिक करिअरदरम्यान दिल्लीसाठी खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध ३२ बॉलमध्ये शतक ठोकले होते.

Comments
Add Comment

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.