Airtelच्या ग्राहकांची मजा, आता या प्लानमध्ये ५६च्या जागी ७० दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी

मुंबई: भारती एअरटेलने(airtel) आपल्या ३९५ रूपयांच्या प्लानच्या व्हॅलिडिटीला वाढवून आता ७० दिवस केले आहे. हा प्लान कंपनीने ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जाहीर केला होता. दरम्यान, या प्लानचे फायदे आधीसारखेच असणार आहेत.


कदाचित कंपनीच्या मते हा प्लान ग्राहकांना जास्त किंमतीमुळे आवडला नसावा. रिलायन्स जिओकडूनही ३९५रूपयांचा प्लान ऑफर केला जातो. दरम्यान यात ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच अनलिमिटेड ५जी डेटाही दिला जातो.


एअरटेलच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, ६०० एसएमएस आणि ६ जीबी डेटा दिला जातो. मात्र अनलिमिटेड ५जी डेटा यात दिला जात नाही. आता कंपनीने प्लानची व्हॅलिडिटी वाढवून ५६ दिवसांवरून ७० दिवस केली आङे. म्हणजेच ग्राहकांना आता या प्लानमध्ये दोन आठवड्यांनी जास्त व्हॅलिडिटी मिळेल. दरम्यान, किंमत आधीचीच आहे. अशातच हा प्लान आता ग्राहकांसाठी स्वस्त झाला आहे.


दुसरीकडे जिओच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा ३९५ रूपयांचा प्लान पुढे हे. कारण यात एअरटेलच्या तुलनेत १४ दिवसांची अधिक व्हॅलिडिटी मिळते.

Comments
Add Comment

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे