मुंबई: भारती एअरटेलने(airtel) आपल्या ३९५ रूपयांच्या प्लानच्या व्हॅलिडिटीला वाढवून आता ७० दिवस केले आहे. हा प्लान कंपनीने ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जाहीर केला होता. दरम्यान, या प्लानचे फायदे आधीसारखेच असणार आहेत.
कदाचित कंपनीच्या मते हा प्लान ग्राहकांना जास्त किंमतीमुळे आवडला नसावा. रिलायन्स जिओकडूनही ३९५रूपयांचा प्लान ऑफर केला जातो. दरम्यान यात ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच अनलिमिटेड ५जी डेटाही दिला जातो.
एअरटेलच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, ६०० एसएमएस आणि ६ जीबी डेटा दिला जातो. मात्र अनलिमिटेड ५जी डेटा यात दिला जात नाही. आता कंपनीने प्लानची व्हॅलिडिटी वाढवून ५६ दिवसांवरून ७० दिवस केली आङे. म्हणजेच ग्राहकांना आता या प्लानमध्ये दोन आठवड्यांनी जास्त व्हॅलिडिटी मिळेल. दरम्यान, किंमत आधीचीच आहे. अशातच हा प्लान आता ग्राहकांसाठी स्वस्त झाला आहे.
दुसरीकडे जिओच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा ३९५ रूपयांचा प्लान पुढे हे. कारण यात एअरटेलच्या तुलनेत १४ दिवसांची अधिक व्हॅलिडिटी मिळते.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…