मुंबई: भारती एअरटेलने(airtel) आपल्या ३९५ रूपयांच्या प्लानच्या व्हॅलिडिटीला वाढवून आता ७० दिवस केले आहे. हा प्लान कंपनीने ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जाहीर केला होता. दरम्यान, या प्लानचे फायदे आधीसारखेच असणार आहेत.
कदाचित कंपनीच्या मते हा प्लान ग्राहकांना जास्त किंमतीमुळे आवडला नसावा. रिलायन्स जिओकडूनही ३९५रूपयांचा प्लान ऑफर केला जातो. दरम्यान यात ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच अनलिमिटेड ५जी डेटाही दिला जातो.
एअरटेलच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, ६०० एसएमएस आणि ६ जीबी डेटा दिला जातो. मात्र अनलिमिटेड ५जी डेटा यात दिला जात नाही. आता कंपनीने प्लानची व्हॅलिडिटी वाढवून ५६ दिवसांवरून ७० दिवस केली आङे. म्हणजेच ग्राहकांना आता या प्लानमध्ये दोन आठवड्यांनी जास्त व्हॅलिडिटी मिळेल. दरम्यान, किंमत आधीचीच आहे. अशातच हा प्लान आता ग्राहकांसाठी स्वस्त झाला आहे.
दुसरीकडे जिओच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा ३९५ रूपयांचा प्लान पुढे हे. कारण यात एअरटेलच्या तुलनेत १४ दिवसांची अधिक व्हॅलिडिटी मिळते.
मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…
मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…