Categories: पालघर

राज्यातील १०६५ गोशाळांनाअनुदान वितरित करण्याची मागणी

Share

मुरबाड : महाराष्ट्रातील १०६५ गोवंश शाळांना तातडीने अनुदान वितरित करण्यात यावे अन्यथा गोपालकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुरबाड तालुक्यातील रामकृष्ण गोशाळेचे संचालक तथा पंचायत समिती मुरबाड माजी सभापती रामभाऊ बांगर यांनी इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील सर्व गोशाळांचे काम एक सूत्र पद्धतीने चालवे म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गठन अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ मध्ये केले होते. यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गोसेवा आयुक्त तसेच गोशाळांना अनुदान म्हणून शंभर कोटी रुपये (७० कोटी गोवर्धन योजना व २० कोटी गोमूल्य वर्धन योजना तसेच १० कोटी गोसेवा आयोग असे मंजूर केले होते.परंतु,पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी आयोगाची नियमावली तयार केल्यामुळे आयोगाला कोणत्याही अधिकार निधी व कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळेचे खूप मोठे नुकसान होत आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित ही योजना कार्यान्वित करण्यात आली तरी सर्व शासकीय नियमानुसार १६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णय सर्व गोशाळांना निधी मंजूर करण्यात आला परंतु पशुसंवर्धन विभाग सचिव तुकाराम मुंढे यांच्या चुकीच्या धोरणामुळे निधी वितरणात विलंब करून शासनाने निधी परत पाठविला.

तसेच,महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा २०१५ नुसार कायदा करण्यात आला. परंतु या कायद्याची कठोर अंमलबजावणी प्रशासनाद्वारे करण्यात येत नाही तसेच या कायद्यानुसार कत्तलीसाठी जाणारा गोवंश पोलीस प्रशासनाने जप्त केल्यास वृद्ध,आजारी,जखमी,गोवंशाचे संगोपन करण्यासाठी शासनाने गोशाळाकडून प्रतिज्ञापत्र घेतले. या विषयांचे संगोपनपालन पोषण व औपचारिक करता महाराष्ट्र शासनाने अन्य राज्याप्रमाणे प्रति दिवस शंभर रुपये अनुदान देण्यात यावे. शासनाने गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या मागणीने संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरला आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

3 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

23 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

56 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago