West Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

  119

१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे अपघाताची (West Bengal train accident) एक धक्कादायक घटना घडली. कंचनजंगा एक्सप्रेस (Kanchenjunga Express) आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. यामुळे रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी अगरतलावरून सियालदाहकडे जाताना भीषण अपघात झाला. या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात सकाळपर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती.मात्र, हा आकडा वाढला असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. या ठिकाणी रेक्यू टीमचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.



रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया


दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

श्रावण संपताच माशांच्या खरेदीवरून हायवेवर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

गोरखपूर: श्रावण महिना संपताच मासे खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र

प्रवाशाला अस्वच्छ सीट दिल्याने इंडिगो एअरलाईन्सला दिड लाखांचा दंड, दिल्ली ग्राहक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली: दिल्ली ग्राहक तक्रार निवारण आयोगाने इंडिगो एअरलाइन्सवर सेवेत कमतरता दाखवून प्रवाशाला अस्वच्छ व डाग

मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्राच्या अडचणी वाढल्या

दोन कंपन्यांमधून ५८ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाईचा रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोप नवी दिल्ली: मनी लाँड्रिंग

'काही लोकं स्वतःला जगाचे "बॉस" समजतात... त्यांना भारताची प्रगती पाहवत नाही': संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भोपाळ: बीईएमएलच्या नवीन रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी

काश्मीरमधील घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन जम्मू आणि काश्मीर:

मोदींच्या हस्ते तीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे एका विशेष समारंभात तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा