West Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे अपघाताची (West Bengal train accident) एक धक्कादायक घटना घडली. कंचनजंगा एक्सप्रेस (Kanchenjunga Express) आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. यामुळे रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी अगरतलावरून सियालदाहकडे जाताना भीषण अपघात झाला. या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात सकाळपर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती.मात्र, हा आकडा वाढला असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. या ठिकाणी रेक्यू टीमचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.



रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया


दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट ४ नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय

घरूनच भरता येणार शाळेची फी ! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि पालकांसाठी सोयी

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या