West Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे अपघाताची (West Bengal train accident) एक धक्कादायक घटना घडली. कंचनजंगा एक्सप्रेस (Kanchenjunga Express) आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. यामुळे रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी अगरतलावरून सियालदाहकडे जाताना भीषण अपघात झाला. या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात सकाळपर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती.मात्र, हा आकडा वाढला असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. या ठिकाणी रेक्यू टीमचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.



रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया


दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती

भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या

Manipur: मणिपूरमध्ये वेगवेगळ्या कारवाईत १० दहशतवाद्यांना अटक

गेल्या २४ तासांत मणिपूरच्या विविध भागात पोलिस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह दहा

Kedarnath Dham: महाशिवरात्रीच्या दिवशी केदारनाथ संस्थेने केली मोठी घोषणा; केदारनाथ धामचे दरवाजे 'या' दिवशी उघडणार

रविवार १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने केदारनाथ संस्थेकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार