West Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

  116

१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे अपघाताची (West Bengal train accident) एक धक्कादायक घटना घडली. कंचनजंगा एक्सप्रेस (Kanchenjunga Express) आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. यामुळे रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी अगरतलावरून सियालदाहकडे जाताना भीषण अपघात झाला. या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात सकाळपर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती.मात्र, हा आकडा वाढला असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. या ठिकाणी रेक्यू टीमचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.



रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया


दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या नुकसानाचा पुरावा दाखवा! अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

चेन्नई : पाकिस्तानच्या विरोधातील ऑपरेश सिंदूर दरम्यान भारताच्या कुठल्या भागात नुकसान झाले याचा एक तरी फोटो

TikTok भारतात पुन्हा येणार? अमेरिकेसाठी खास 'M2' व्हर्जन चर्चेत!

एकेकाळी भारतात तुफान लोकप्रिय ठरलेलं TikTok ॲप भारतातून बॅन करण्यात आलं होतं. पण आता अमेरिकेसाठी "TikTok M2" नावाचं एक नवीन

गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित

गांधीनगर : वडोदरा आणि आणंदला जोडणाऱ्या ४० वर्षे जुन्या गंभीरा पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळल्याने आतापर्यंत

आधार कार्ड नागरिकत्त्वाचा पुरावा नाही, सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचे उत्तर

नवी दिल्ली : आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे उत्तर निवडणूक आयोगाने आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात

कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार, Video सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील KAP'S CAFE वर गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांनी कारमधून पिस्तुल काढत

उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित

नवी दिल्ली : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी आणि २३ वर्षांख