मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनचा वेग मंदावला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच उन्हाचा कडाका बसत आहे. मान्सूनचा वेग मंदावल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या मात्र विदर्भात पुरेसा पाऊस झालेला नाही. दरम्यान, पावसाचा वेग वाढण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मात्र यांचा जोर तितका नाही. दरम्यान, पावसाची प्रगती मंदावल्याने काही ठिकाणी उन्हाचे पुन्हा चटके बसू लागते. अनेक ठिकाणी तर तापमान वाढून ३५ ते ४० अंशापर्यंत पोहोचले आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी पावसाच्या शाखा मजबूत होतील आणि त्यानंतर पावसाचा जोर २० जूननंतर वाढेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
अद्याप उन्हाचे चटके सहन करणारा विदर्भ मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विदर्भात हवा तितका पाऊस झालेला नाही त्यामुळे तेथील लोक पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…