BAN vs NEP : बांगलादेशने रोमहर्षक सामन्यात नेपाळला २१ धावांनी हरवले, सुपर८मध्ये केला प्रवेश

मुंबई: बांगलादेश संघाने दमदार कामगिरी करताना नेपाळला २१ धावांनी हरवले आहे. या विजयासह टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये स्थान मिळवले आहे. बांगलादेशने सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाला केवळ ८५ धावाच करता आल्या. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तंजीम हसन शाकिबने ४ विकेट मिळवल्या. नेपाळसाठी कुशल मल्लाने २७ धावा केल्या.


बांगलादेशने दिलेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाने १९.२ षटकांत ८५ धावा केल्या, नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र फलंदाज काही खास करू शकले नाहीत. कुशल मल्लाने ४० बॉलमध्ये २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंहने ३१ बॉलमध्ये २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार लगावले.


बांगलादेशने पहिल्यांदा बॅटिंग करताना १०६ धावा केल्या. या दरम्यान शाकिबने २२ बॉलचा सामना करताना १७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार लगावले. लिटन दास १० धावा करून बाद झाला. तंजिम हसन केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर जाकिर अली १२ धावा करून बाद झाला. कर्णधार नजमुल हुसैन शंटो केवळ ४ धावा करून बाद झाला.



सुपर८मध्ये प्रवेश


बांगलादेशने नेपाळला हरवत सुपर८मध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळलेत त्यापैकी ३मध्ये विजय मिळवला. तर एका सामन्यात पराभव पाहावा लागला. बांगलादेशचे सहा गुण आहेत.

Comments
Add Comment

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याचा 'नादखुळा' अंदाज! पाकिस्तानला धूळ चारल्यावर ३ शब्दांत दिला विजयाचा मंत्र; काय लिहिलंय नेमकं?

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव करत क्रिकेट

T20 World Cup 2026 IND vs PAK: हार्दिक पांड्या अन् कुलदीप यादवमध्ये राडा ? १८ व्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं ?

मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

T20 World Cup 2026 IND vs PAK: पाकिस्तान विरोधात भारताचा विजय; सोशल मीडियावर पाकिस्तानची नाचक्की

मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने

पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.