BAN vs NEP : बांगलादेशने रोमहर्षक सामन्यात नेपाळला २१ धावांनी हरवले, सुपर८मध्ये केला प्रवेश

  68

मुंबई: बांगलादेश संघाने दमदार कामगिरी करताना नेपाळला २१ धावांनी हरवले आहे. या विजयासह टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये स्थान मिळवले आहे. बांगलादेशने सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाला केवळ ८५ धावाच करता आल्या. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तंजीम हसन शाकिबने ४ विकेट मिळवल्या. नेपाळसाठी कुशल मल्लाने २७ धावा केल्या.


बांगलादेशने दिलेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाने १९.२ षटकांत ८५ धावा केल्या, नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र फलंदाज काही खास करू शकले नाहीत. कुशल मल्लाने ४० बॉलमध्ये २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंहने ३१ बॉलमध्ये २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार लगावले.


बांगलादेशने पहिल्यांदा बॅटिंग करताना १०६ धावा केल्या. या दरम्यान शाकिबने २२ बॉलचा सामना करताना १७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार लगावले. लिटन दास १० धावा करून बाद झाला. तंजिम हसन केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर जाकिर अली १२ धावा करून बाद झाला. कर्णधार नजमुल हुसैन शंटो केवळ ४ धावा करून बाद झाला.



सुपर८मध्ये प्रवेश


बांगलादेशने नेपाळला हरवत सुपर८मध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळलेत त्यापैकी ३मध्ये विजय मिळवला. तर एका सामन्यात पराभव पाहावा लागला. बांगलादेशचे सहा गुण आहेत.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट