BAN vs NEP : बांगलादेशने रोमहर्षक सामन्यात नेपाळला २१ धावांनी हरवले, सुपर८मध्ये केला प्रवेश

मुंबई: बांगलादेश संघाने दमदार कामगिरी करताना नेपाळला २१ धावांनी हरवले आहे. या विजयासह टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये स्थान मिळवले आहे. बांगलादेशने सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाला केवळ ८५ धावाच करता आल्या. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तंजीम हसन शाकिबने ४ विकेट मिळवल्या. नेपाळसाठी कुशल मल्लाने २७ धावा केल्या.


बांगलादेशने दिलेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाने १९.२ षटकांत ८५ धावा केल्या, नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र फलंदाज काही खास करू शकले नाहीत. कुशल मल्लाने ४० बॉलमध्ये २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंहने ३१ बॉलमध्ये २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार लगावले.


बांगलादेशने पहिल्यांदा बॅटिंग करताना १०६ धावा केल्या. या दरम्यान शाकिबने २२ बॉलचा सामना करताना १७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार लगावले. लिटन दास १० धावा करून बाद झाला. तंजिम हसन केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर जाकिर अली १२ धावा करून बाद झाला. कर्णधार नजमुल हुसैन शंटो केवळ ४ धावा करून बाद झाला.



सुपर८मध्ये प्रवेश


बांगलादेशने नेपाळला हरवत सुपर८मध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळलेत त्यापैकी ३मध्ये विजय मिळवला. तर एका सामन्यात पराभव पाहावा लागला. बांगलादेशचे सहा गुण आहेत.

Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने