BAN vs NEP : बांगलादेशने रोमहर्षक सामन्यात नेपाळला २१ धावांनी हरवले, सुपर८मध्ये केला प्रवेश

मुंबई: बांगलादेश संघाने दमदार कामगिरी करताना नेपाळला २१ धावांनी हरवले आहे. या विजयासह टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये स्थान मिळवले आहे. बांगलादेशने सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाला केवळ ८५ धावाच करता आल्या. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तंजीम हसन शाकिबने ४ विकेट मिळवल्या. नेपाळसाठी कुशल मल्लाने २७ धावा केल्या.


बांगलादेशने दिलेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाने १९.२ षटकांत ८५ धावा केल्या, नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र फलंदाज काही खास करू शकले नाहीत. कुशल मल्लाने ४० बॉलमध्ये २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंहने ३१ बॉलमध्ये २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार लगावले.


बांगलादेशने पहिल्यांदा बॅटिंग करताना १०६ धावा केल्या. या दरम्यान शाकिबने २२ बॉलचा सामना करताना १७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार लगावले. लिटन दास १० धावा करून बाद झाला. तंजिम हसन केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर जाकिर अली १२ धावा करून बाद झाला. कर्णधार नजमुल हुसैन शंटो केवळ ४ धावा करून बाद झाला.



सुपर८मध्ये प्रवेश


बांगलादेशने नेपाळला हरवत सुपर८मध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळलेत त्यापैकी ३मध्ये विजय मिळवला. तर एका सामन्यात पराभव पाहावा लागला. बांगलादेशचे सहा गुण आहेत.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख