Team India: टीम इंडियाचे सुपर८ साठी वेळापत्रक ठरले...पाहा कोणाचे रंगणार सामने

मुंबई: भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंंडिया टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८चे सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक सेट झाले आहे.


सुपर ८मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप एमध्ये आहे. या ग्रुपमधून भारतासोबत यूएसएनेही सुपर ८साठी क्वालिफाय केले आहे. भारताचा सुपर ८मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना बारबाडोस येथे २० जूनला खेळवला जाईल.


भारतीय संघ सुपर ८मधील सर्व सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळेल. त्यांचा दुसरा सामना २२ जूनला आहे. हा सामना अँटिग्वा येथे होईल. येथे त्यांचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. मात्र हा संघ अद्याप ठरलेला नाही. भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना सेंट लूसियामध्ये २४ तारखेला खेळवला जाईल.



सुपर ८चे सामने नसणार सोपे


जर भारताचे सुपर८मधील सामने पाहिले तर त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा असणार नाही. अफगाणिस्तानचा संघ फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ग्रुप सामन्यांमध्ये न्यूझीलंडलाही हरवले. दरम्यान, टीम इंडियाला कडवी टक्कर मिळू शकते. भारताचा एक सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. ऑस्ट्रेलिया संघही धोकादायक आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास काही सोपा नाही.

Comments
Add Comment

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा

आरबीआयकडून आयात निर्यातीसाठी FEMA 1999 ऐवजी FEMA 2026 लागू होणार नेमके काय बदल वाचा!

मोहित सोमण: भारतातील उत्पादन क्षेत्रासह आणखी प्रमुख क्षेत्र म्हणजे आयात निर्यात क्षेत्र आहे. भारतीय

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

जालना महापालिकेत भाजपचाच बोलबाला

जालना : जालना महानगरपालिकेवर स्वतःची सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ६५ पैकी ४१ जागा जिंकून

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,