Team India: टीम इंडियाचे सुपर८ साठी वेळापत्रक ठरले...पाहा कोणाचे रंगणार सामने

  167

मुंबई: भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंंडिया टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८चे सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक सेट झाले आहे.


सुपर ८मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप एमध्ये आहे. या ग्रुपमधून भारतासोबत यूएसएनेही सुपर ८साठी क्वालिफाय केले आहे. भारताचा सुपर ८मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना बारबाडोस येथे २० जूनला खेळवला जाईल.


भारतीय संघ सुपर ८मधील सर्व सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळेल. त्यांचा दुसरा सामना २२ जूनला आहे. हा सामना अँटिग्वा येथे होईल. येथे त्यांचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. मात्र हा संघ अद्याप ठरलेला नाही. भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना सेंट लूसियामध्ये २४ तारखेला खेळवला जाईल.



सुपर ८चे सामने नसणार सोपे


जर भारताचे सुपर८मधील सामने पाहिले तर त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा असणार नाही. अफगाणिस्तानचा संघ फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ग्रुप सामन्यांमध्ये न्यूझीलंडलाही हरवले. दरम्यान, टीम इंडियाला कडवी टक्कर मिळू शकते. भारताचा एक सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. ऑस्ट्रेलिया संघही धोकादायक आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास काही सोपा नाही.

Comments
Add Comment

Health: दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी ५ महत्त्वाच्या सवयी

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्यासह निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण हे फक्त इच्छा असून साध्य होत

गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली