Team India: टीम इंडियाचे सुपर८ साठी वेळापत्रक ठरले...पाहा कोणाचे रंगणार सामने

मुंबई: भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंंडिया टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८चे सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक सेट झाले आहे.


सुपर ८मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप एमध्ये आहे. या ग्रुपमधून भारतासोबत यूएसएनेही सुपर ८साठी क्वालिफाय केले आहे. भारताचा सुपर ८मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना बारबाडोस येथे २० जूनला खेळवला जाईल.


भारतीय संघ सुपर ८मधील सर्व सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळेल. त्यांचा दुसरा सामना २२ जूनला आहे. हा सामना अँटिग्वा येथे होईल. येथे त्यांचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. मात्र हा संघ अद्याप ठरलेला नाही. भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना सेंट लूसियामध्ये २४ तारखेला खेळवला जाईल.



सुपर ८चे सामने नसणार सोपे


जर भारताचे सुपर८मधील सामने पाहिले तर त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा असणार नाही. अफगाणिस्तानचा संघ फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ग्रुप सामन्यांमध्ये न्यूझीलंडलाही हरवले. दरम्यान, टीम इंडियाला कडवी टक्कर मिळू शकते. भारताचा एक सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. ऑस्ट्रेलिया संघही धोकादायक आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास काही सोपा नाही.

Comments
Add Comment

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

पेटीएम ट्रॅव्हलचा ‘महा कार्निव्हल सेल’

विमान आणि बस प्रवासावर २० % पर्यंत सणासुदीची सवलत मुंबई:पेटीएमने ‘महा कार्निव्हल सेल’ची घोषणा केली आहे. या

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात