Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार! कन्नड शाळांमध्ये चक्क ११ मराठी शिक्षकांची नियुक्ती

नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीने धरला जोर


सांगली : सांगली जिल्हा परिषदेचा (Sangli Zilla Parishad) अजब कारभार समोर आला आहे. कन्नड माध्यमाच्या (Kannada medium) शाळेमध्ये परिषदेने चक्क मराठी माध्यमाच्या (Marathi medium) ११ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे हे शिक्षक कन्नड विद्यार्थ्यांना काय शिकवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कनन्ड विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने या नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यातील १० कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये ११ मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती सांगली जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही नियुक्ती केली गेली आहे. या भोंगळ कारभारावर जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आरोप केला आहे. कन्नड शाळेतील मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी विक्रम सावंत यांनी केली आहे. त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.



कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होईल


जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर राज्य सरकारच्या १३२ कन्नड शाळा आहेत. मात्र, यामधील १० शाळांमध्ये ११ मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती झाल्याने ते शिकवणार काय? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या भोंगळ कारभारनामुळे कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू