Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का...

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच मोबाईलवर असतात. जर एक मिनिटही फोन आपल्या हातात नसेल तर असे वाटते की आपण काही विसरलो आहोत. फोनशिवाय तर अनेकांना चैनही पडत नाही. आपल्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.


मात्र तुम्हाला माहीत आहे का प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल वापरणेही अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होत आहेत. तर दररोज किती तास मोबाईल वापरला पाहिजे हे जाणून घ्या...



मुलांसाठी तसेच किशोरावस्थेतील मुलांसाठी


तज्ञांच्या म्हणण्यानुसार मुले तसेच किशोरवयीन मुलांनी दिवसातून २ तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर करू नये. जास्त फोन पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांची झोपही खराब होऊ शकते. याशिवाय त्यांच्या शारिरीक विकासावरही परिणाम होतो.



वयस्कर लोकांसाठी


वयस्कर लोकांनी दिवसांतून ३ ते ४ तास मोबाईल वापरणे हे योग्य मानले जाते. दरम्यान ही वेळ काम आणि त्यांच्या गरजानुसार बदलू शकते. जर दिवसभर तुमचे काम फोन तसेच कम्प्युटरवर असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. डोळ्यांना आराम दिला पाहिजे. जास्त फोनच्या वापरामुळे डोळ्यांना थकवा, डोकेदुखी तसेच तणाव येऊ शकतो.



वयोवृद्धांसाठी


वयोवृद्ध लोकांनी फोनचा वापर मर्यादित केला पाहिजे. खासकरून ज्यांना डोळ्यासंबंधित आजार आहेत. त्यांनी दिवसांतून एक ते दोन तास वापर करणे ठीक असू शकते.

Comments
Add Comment

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास