Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का...

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच मोबाईलवर असतात. जर एक मिनिटही फोन आपल्या हातात नसेल तर असे वाटते की आपण काही विसरलो आहोत. फोनशिवाय तर अनेकांना चैनही पडत नाही. आपल्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.


मात्र तुम्हाला माहीत आहे का प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल वापरणेही अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होत आहेत. तर दररोज किती तास मोबाईल वापरला पाहिजे हे जाणून घ्या...



मुलांसाठी तसेच किशोरावस्थेतील मुलांसाठी


तज्ञांच्या म्हणण्यानुसार मुले तसेच किशोरवयीन मुलांनी दिवसातून २ तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर करू नये. जास्त फोन पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांची झोपही खराब होऊ शकते. याशिवाय त्यांच्या शारिरीक विकासावरही परिणाम होतो.



वयस्कर लोकांसाठी


वयस्कर लोकांनी दिवसांतून ३ ते ४ तास मोबाईल वापरणे हे योग्य मानले जाते. दरम्यान ही वेळ काम आणि त्यांच्या गरजानुसार बदलू शकते. जर दिवसभर तुमचे काम फोन तसेच कम्प्युटरवर असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. डोळ्यांना आराम दिला पाहिजे. जास्त फोनच्या वापरामुळे डोळ्यांना थकवा, डोकेदुखी तसेच तणाव येऊ शकतो.



वयोवृद्धांसाठी


वयोवृद्ध लोकांनी फोनचा वापर मर्यादित केला पाहिजे. खासकरून ज्यांना डोळ्यासंबंधित आजार आहेत. त्यांनी दिवसांतून एक ते दोन तास वापर करणे ठीक असू शकते.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व