Nitish Kumar : नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली! मेदांता रुग्णालयात केलं दाखल

पाटणा : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री आणि एनडीए सरकामधील (NDA Government) जदयू (JDU) पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) उपचार घेत आहेत. आज सकाळी नितीश कुमार यांचा हात दुखू लागल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालात दाखल करण्यात आलं. या रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागात त्यांची तपासणी करण्यात आली.


लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात त्यांनी आराम केला नव्हता. शिवाय प्रचारासाठीच्या धावपळीमुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात आहे. नितीश कुमार यांच्या दैनंदिन कार्यक्रमात मागील काही दिवसांपासून वाढ झाली होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक प्रचार दौरे केले होते. तर दिल्लीत एनडीए सरकार स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. या सर्व कारणामुळे नितीश कुमार यांनी पुरेसा आराम केला नाही आणि त्यामुळेच त्यांची तब्येत खालावली होती.


बिहारमधील भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर नितीश कुमार अस्वस्थ झाले होते. सुशीलकुमार मोदी यांच्या अंत्यसंस्काराला देखील ते जाऊ शकले नव्हते. नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील ते गेले नव्हते. तर, काही ठिकाणी निवडणुकीतील प्रचाराचे कार्यक्रम देखील नितीश कुमार यांनी रद्द केले होते. अशा धावपळीतच त्यांचा हात अचानक दुखू लागल्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात