OMAN vs ENG: इंग्लंडचा कहर, फक्त १९ बॉलमध्ये ओमानचा केला पराभव

मुंबई: इंग्लंडने अँटीग्वामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात ओमानचा लाजिरवाणा पराभव केला. त्यांनी हा सामना ८ विकेटनी जिंकला. इंग्लंडने या विजयासह टी-२० वर्ल्डकप २०२४मधील सुपर ८च्या आशा कायम ठेवल्या आहे.


इंग्लंडने ओमानविरुद्ध रेकॉर्डतोड कामगिरी केली. ओमानने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ४७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने हे आव्हान १९ बॉलमध्येच पूर्ण केले.


टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या ओमानचा संघ ४७ धावांवर ढेपाळला. त्यांचा एक खेळाडू सोडला तर इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शोएब खानने २३ चेंडूंचा सामना करताना ११ धावा केल्या. कर्णधार आकिब केवळ ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खालिद १ धावेवर बाद झाला. या दरम्यान इंग्लंडसाठी आदिल रशीदनने घातक गोलंदाजी केली. त्याने ४ विकेट मिळवले. रशीदनने ४ षटकांत केवळ ११ धावा केल्या. तर जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी ३ विकेट मिळवल्या.



केवळ ३.१ षटकांत मिळवले लक्ष्य


ओमानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने केवळ ३.१ षटकांत विजय मिळवला. दरम्यान, त्यांचे २ विकेटही पडले. इंग्लंडसाठी फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर सलामीसाठी आले. या दरम्यान, सॉल्ट ३ बॉलमध्ये १२ धावा करून बाद झाला. बटलर शेवटपर्यंत टिकला. त्याने नाबाद २४ धावा ठोकल्या. विल जॅक्स ५ धावा करून बाद झाला. तर जॉनी बेअरस्ट्रॉ धावांवर नाबाद राहिला.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण

भारताचे सलग चौथ्या टी-२० विजयाकडे लक्ष

आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या