T-20 world cup 2024: भारताच्या विजयाने पाकिस्तानला झाला आनंद

  116

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली आणि टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेच्या संघाला ७ विकेटनी हरवले. हा भारताचा सलग तिसरा विजय आहे.


टी-२० वर्ल्डकप २०२४चे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. भारताचा हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान ३ विकेट गमावताना पूर्ण केले आणि सामना आपल्या नावे केला.



भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश


कठीण परिस्थितीत अडकलेला पाकिस्तानचा संघ या सामन्यात भारताच्या विजयासाठीच प्रार्थना करत होता. पाकिस्तानला जर सुपर ८ला क्वालिफाय करायचे असेल तर त्याला उरलेला सामना जिंकावा लागेल. सोबतच अमेरिकेने उरलेला सामना गमवावा अशी प्रार्थना करावी लागेल.


ग्रुप एमध्ये भारतीय संघ ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. त्यांचे ४ गुण आहेत. भारताच्या विजयाने पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार