T-20 world cup 2024: भारताच्या विजयाने पाकिस्तानला झाला आनंद

  113

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली आणि टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेच्या संघाला ७ विकेटनी हरवले. हा भारताचा सलग तिसरा विजय आहे.


टी-२० वर्ल्डकप २०२४चे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. भारताचा हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान ३ विकेट गमावताना पूर्ण केले आणि सामना आपल्या नावे केला.



भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश


कठीण परिस्थितीत अडकलेला पाकिस्तानचा संघ या सामन्यात भारताच्या विजयासाठीच प्रार्थना करत होता. पाकिस्तानला जर सुपर ८ला क्वालिफाय करायचे असेल तर त्याला उरलेला सामना जिंकावा लागेल. सोबतच अमेरिकेने उरलेला सामना गमवावा अशी प्रार्थना करावी लागेल.


ग्रुप एमध्ये भारतीय संघ ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. त्यांचे ४ गुण आहेत. भारताच्या विजयाने पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत.

Comments
Add Comment

व्हीआयपींच्या उपस्थितीत रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न

लखनऊ : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनऊ येथील द

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.