Raj Thackeray : मराठी माणसाच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग; जनता मनसेची वाट पाहतेय!

  125

कार्यकर्त्यांना संबोधित करताना काय म्हणाले राज ठाकरे?


मुंबई : लोकसभेत (Loksabha) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेसाठी (Vidhansabha) मात्र मनसे (MNS) स्वबळावर लढणार असल्याची चिन्हे आहेत. आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे मनसेने महाराष्ट्रात चाचपणी सुरु केली आहे. विधानसभेसाठी मनसे २००-२५० जागांची तयारी करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) सडकून टीका केली.


उद्धव ठाकरेंना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नाही. त्यांना वाटत असेल की, आपल्याला मतदान झालं आहे. मात्र, तसं झालेलं नाही. उद्धव ठाकरेंना जे मतदान झालं आहे ते मोदी विरोधातील मतदान आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही राग आहे. त्यामुळे जनता मनसेची वाट पाहत आहे. २०० ते २२५ जागांवर आपण तयारी करत आहोत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असेल, यांच्यातच काही जागावाटप ठरत नाही. मी सुद्धा जागा मागायला जाणार नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.



मतदारसंघनिहाय आढावा घेण्याकरत टीम्स तयार करणार


पुढे ते म्हणाले की, युती आघाडीबाबत लक्ष देऊ नका. विधानसभेत जी भूमिका असेल ती मी योग्यवेळी तुमच्यासमोर मांडणार आहे. पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जाणार आहे ती त्यांनी लवकरात लवकर देणं क्रमप्राप्त असणार आहे. दरम्यान मतदारसंघ आढावा घेण्यासाठी कोण टीम असतील हे तुम्हाला सांगितलं जाईल. ते त्यांचं काम करतील आणि रिपोर्ट देतील असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.