महाराज असती ब्रह्मंडात l रक्षिती अखिल विश्वात ll

गजानन महाराज - प्रवीण पांडे, अकोला


मी ना जोशी यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव.
काही दिवसांपूर्वी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही पॅरिस विमानतळावर उतरून, इंमिग्रेशनचे सगळे सोपस्कार पूर्ण करून, मेट्रो ट्रेनमध्ये चढलो. मनातल्या मनात ‘गण गण गणात बोते’ हा जप जमेल तसा सुरू होता. बरोबर दोन सूटकेसेस आणि दोन हातात पिशव्या, पर्स असे साहित्य सोबतीला होते. गाडीत माझ्यापुढे आधी माझे पती चढले.


त्यांच्यामागे मी. पुढे बघते तर माझ्या डाव्या बाजूचा एक धष्टपुष्ट निग्रो माणूस मिस्टरांना विचित्र पद्धतीने मागे ढकलत होता. मला काही तरी विचित्र आहे, असं वाटेस्तोवर त्याच ते ढकलणं थांबलं. मग बघते तर माझ्या उजव्या बाजूला आणि मागे अजून दोन धटिंगण निग्रो होते आणि माझ्या पर्सची झिप अर्धवट उघडी होती. ती मी लगेच लावली आणि सावध झाले. उतरल्यावर माझ्या पतींनी मला सांगितले की, जे त्यांना धक्का मारत होते, त्यांनी ढकललं त्यांच्या कोटच्या आतल्या खिशात हात घातला होता; पण तेसुद्धा सावध झाले होते. श्री गजानन महाराजांच्या कृपेने आमचे पासपोर्ट, पैसे आणि इतर सामान सुरक्षित होते. त्या बदमाश लोकांनी जर यांचे पाकीट उडविले असते, तर सगळीच गडबड झाली असती. विदेशात पासपोर्ट नाही म्हणजे तिथे राहणे, पुन्हा परत येणेसुद्धा लांबले असते. त्याकरिता किती यातायात करावी लागली असते, ते वेगळेच. विदेशात परक्या ठिकाणी आपल्याला एवढी माहितीसुद्धा नसते म्हणजेच आपल्या स्थानिक नातेवाइकांना सुद्धा सर्व कामे सोडून धावपळ करावी लागते. या सर्व गोष्टींमुळे होणारा मनस्ताप हा अतिजास्त असतो.


महाराज खरोखर धन्य आहेत. वेळेवर आम्हा दोघांना सावध करून, आमचे तसेच साहित्याचे रक्षण केले. महाराज सदैव आपल्या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेतात, याचा पुन्हा प्रत्यय आला.


जय श्री गजानन...

Comments
Add Comment

ज्ञानाचे मर्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  सगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे

चित्ताची एकाग्रता

आत्मज्ञान : प्राची परचुरे - वैद्य आजच्या तंत्रज्ञानप्रधान धावपळीच्या युगात माणसाचे चित्त खूपच अस्थिर झाले आहे.

महर्षी भारद्वाज

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी आपल्या देदिप्यमान तेजाने आसमंतात अखंड झळकणाऱ्या सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे

माँ नर्मदा... एक अध्यात्मिक परिक्रमा!!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे!! आजच्या भागात आपण नर्मदा परिक्रमा कोणकोणत्या

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव