महाराज असती ब्रह्मंडात l रक्षिती अखिल विश्वात ll

गजानन महाराज - प्रवीण पांडे, अकोला


मी ना जोशी यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव.
काही दिवसांपूर्वी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही पॅरिस विमानतळावर उतरून, इंमिग्रेशनचे सगळे सोपस्कार पूर्ण करून, मेट्रो ट्रेनमध्ये चढलो. मनातल्या मनात ‘गण गण गणात बोते’ हा जप जमेल तसा सुरू होता. बरोबर दोन सूटकेसेस आणि दोन हातात पिशव्या, पर्स असे साहित्य सोबतीला होते. गाडीत माझ्यापुढे आधी माझे पती चढले.


त्यांच्यामागे मी. पुढे बघते तर माझ्या डाव्या बाजूचा एक धष्टपुष्ट निग्रो माणूस मिस्टरांना विचित्र पद्धतीने मागे ढकलत होता. मला काही तरी विचित्र आहे, असं वाटेस्तोवर त्याच ते ढकलणं थांबलं. मग बघते तर माझ्या उजव्या बाजूला आणि मागे अजून दोन धटिंगण निग्रो होते आणि माझ्या पर्सची झिप अर्धवट उघडी होती. ती मी लगेच लावली आणि सावध झाले. उतरल्यावर माझ्या पतींनी मला सांगितले की, जे त्यांना धक्का मारत होते, त्यांनी ढकललं त्यांच्या कोटच्या आतल्या खिशात हात घातला होता; पण तेसुद्धा सावध झाले होते. श्री गजानन महाराजांच्या कृपेने आमचे पासपोर्ट, पैसे आणि इतर सामान सुरक्षित होते. त्या बदमाश लोकांनी जर यांचे पाकीट उडविले असते, तर सगळीच गडबड झाली असती. विदेशात पासपोर्ट नाही म्हणजे तिथे राहणे, पुन्हा परत येणेसुद्धा लांबले असते. त्याकरिता किती यातायात करावी लागली असते, ते वेगळेच. विदेशात परक्या ठिकाणी आपल्याला एवढी माहितीसुद्धा नसते म्हणजेच आपल्या स्थानिक नातेवाइकांना सुद्धा सर्व कामे सोडून धावपळ करावी लागते. या सर्व गोष्टींमुळे होणारा मनस्ताप हा अतिजास्त असतो.


महाराज खरोखर धन्य आहेत. वेळेवर आम्हा दोघांना सावध करून, आमचे तसेच साहित्याचे रक्षण केले. महाराज सदैव आपल्या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेतात, याचा पुन्हा प्रत्यय आला.


जय श्री गजानन...

Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,