पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

मान्सून कालावधीत ठाणे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश


ठाणे : पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज दिले.


पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ सहभागी झाले होते.


धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम पडल्यास, ही तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. अशा देखील सूचना या ठिकाणी पिण्याचे पाणी, विजेची सुविधा असावी, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली या महापालिकांचे आयुक्त, अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्त, रेल्वे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन, कृषी, जलसंपदा आदी विभागाचे अधिकारी यावेळी ऑनलाईन उपस्थित होते.



साथीच्या रोगावरील औषधांचा पुरेसा साठा ठेवा


जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन, श्री. देसाई म्हणाले की, पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात नाले तुंबणे, पाणी साचणे असे प्रकार होतात. अशा ठिकाणी महानगरपालिका, नगर पालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करावी. महापालिका, नगर परिषदांनी आतापर्यंत नालेसफाई पूर्ण केली आहे. परंतु काही वेळेस एकदम येणाऱ्या पावसामुळे अनेक वेळेस गटारीमध्ये घाण साचून नाले तुंबतात. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे