Parliamentary session : 'या' तारखेपासून सुरु होणार संसदीय अधिवेशन!

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) पार पडल्या असून निकालही लागले आहेत. यानंतर एनडीएकडून नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान पदाची निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारत कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता संसदीय अधिवेशन (Parliamentary session) होणार असून त्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अठराव्‍या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार आहे. या कालावधीत नूतन खासदारांची शपथ, लोकसभा अध्‍यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली आहे. १८ व्‍या लोकसभेत सत्ताधारी भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएचे (NDA) २९३ खासदार आहेत तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे २४० खासदार आहेत.



'या' तारखेपासून राज्यसभेचे अधिवेशन सुरु होणार


लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून होणार आहे तर राज्यसभेचे २७ जूनपासून सुरू होणार आहे. नऊ दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन संसद सदस्य (एमपी) त्यांची शपथ घेतील. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) सभागृहाला संबोधित करतील.


दरम्यान, लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षांकडे जाणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये टीडीपी किंवा जेडीयू या पक्षांच्या खासदाराकडे लोकसभा अध्यक्षपद जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे. तसेच लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपाच्या खासदार डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात