Parliamentary session : 'या' तारखेपासून सुरु होणार संसदीय अधिवेशन!

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) पार पडल्या असून निकालही लागले आहेत. यानंतर एनडीएकडून नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान पदाची निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारत कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता संसदीय अधिवेशन (Parliamentary session) होणार असून त्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अठराव्‍या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार आहे. या कालावधीत नूतन खासदारांची शपथ, लोकसभा अध्‍यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली आहे. १८ व्‍या लोकसभेत सत्ताधारी भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएचे (NDA) २९३ खासदार आहेत तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे २४० खासदार आहेत.



'या' तारखेपासून राज्यसभेचे अधिवेशन सुरु होणार


लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून होणार आहे तर राज्यसभेचे २७ जूनपासून सुरू होणार आहे. नऊ दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन संसद सदस्य (एमपी) त्यांची शपथ घेतील. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) सभागृहाला संबोधित करतील.


दरम्यान, लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षांकडे जाणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये टीडीपी किंवा जेडीयू या पक्षांच्या खासदाराकडे लोकसभा अध्यक्षपद जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे. तसेच लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपाच्या खासदार डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या