न्यूयॉर्क: अर्शदीप सिंह याने घेतलेल्या चार बळींच्या जोरावर भारताला यूएसएकडून १११ धावांचे आव्हान मिळाले आहे. भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत यूएसएला फलंदाजीस बोलावले. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
अर्शदीप सिंहने चार विकेट घेत यूएसएच्या डावाला खिंडार पाडले. त्याने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करताना यूएसएच्या फलंदाजांना सळो की पळो करून टाकले. अखेर यूएसएने २० षटकांत ८ बाद ११० धावा केल्या. भारताला विजयासाठी १११ धावांची आवश्यकता आहे.
यूएसएचा सलामीवीर स्टीव्हन टेलरच्या २४ धावा, नितीश कुमारच्या २७ धावा, कोरे अँडरसनच्या १५ धावा या व्यक्तिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले नाही. यूएसएचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.
भारताकडून अर्शदीप सिंहने ४ विकेट तर हार्दिक पांड्याने २ आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…