न्यूयॉर्क: अर्शदीप सिंह याने घेतलेल्या चार बळींच्या जोरावर भारताला यूएसएकडून १११ धावांचे आव्हान मिळाले आहे. भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत यूएसएला फलंदाजीस बोलावले. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
अर्शदीप सिंहने चार विकेट घेत यूएसएच्या डावाला खिंडार पाडले. त्याने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करताना यूएसएच्या फलंदाजांना सळो की पळो करून टाकले. अखेर यूएसएने २० षटकांत ८ बाद ११० धावा केल्या. भारताला विजयासाठी १११ धावांची आवश्यकता आहे.
यूएसएचा सलामीवीर स्टीव्हन टेलरच्या २४ धावा, नितीश कुमारच्या २७ धावा, कोरे अँडरसनच्या १५ धावा या व्यक्तिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले नाही. यूएसएचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.
भारताकडून अर्शदीप सिंहने ४ विकेट तर हार्दिक पांड्याने २ आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…