India vs USA: अर्शदीप सिंहचा चौकार, भारतासमोर यूएसएचे १११ धावांचे आव्हान

न्यूयॉर्क: अर्शदीप सिंह याने घेतलेल्या चार बळींच्या जोरावर भारताला यूएसएकडून १११ धावांचे आव्हान मिळाले आहे. भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत यूएसएला फलंदाजीस बोलावले. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.


अर्शदीप सिंहने चार विकेट घेत यूएसएच्या डावाला खिंडार पाडले. त्याने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करताना यूएसएच्या फलंदाजांना सळो की पळो करून टाकले. अखेर यूएसएने २० षटकांत ८ बाद ११० धावा केल्या. भारताला विजयासाठी १११ धावांची आवश्यकता आहे.


यूएसएचा सलामीवीर स्टीव्हन टेलरच्या २४ धावा, नितीश कुमारच्या २७ धावा, कोरे अँडरसनच्या १५ धावा या व्यक्तिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले नाही. यूएसएचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.


भारताकडून अर्शदीप सिंहने ४ विकेट तर हार्दिक पांड्याने २ आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना