न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) भारत आणि यूएसए यांच्यात रंगलेल्या सामन्यात भारताने अखेर बाजी मारली. यूएसएने विजयासाठी दिलेले १११ धावांचे आव्हान भारताने ७ विकेट राखत पूर्ण केले. भारताच्या विजयाची ही हॅटट्रिक आहे. भारताने यासोबतच टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे.
भारताच्या विजयाचे हिरो ठरले सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे. भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी आधी भार सांभाळला. त्यानंतर पंत १८ धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला सोबत घेतले आणि भारताला विजय गाठून दिला.
सूर्यकुमार यादवने या सामन्यात अर्धशतक ठोकत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यादवने नाबाद ५० धावा ठोकल्या. दुसरीकडे गोलंदाजीत शिवम दुबे जरी चालला नसला तरी त्याने फलंदाजीतून दाखवून दिले की तो ही काही कमी नाही. त्याने नाबाद ३१ धावा केल्या. यूएसएने भारताला विजयासाठी संघर्ष करायला लावला.
खरंतर १११ धावांचे आव्हान भारतासाठी काही मोठे नव्हते. मात्र असे असतानाही नवख्या यूएसए संघाने भारताला संघर्ष करायला लावला. यूएसएकडून सौरभ नेत्रावलकरने २ विकेट घेतल्या.
टी-२० वर्ल्डकपमधील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. पहिला विजय त्यांनी आयर्लंडविरुद्ध मिळवला होता. त्यानंतर भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवले. त्यानंतर आता तिसरा विजय यूएसएविरुद्ध मिळवला आहे.
भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…
पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…
पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…
जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…
ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…