विठूभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोणत्याही गावातून थेट पंढरपूर गाठता येणार

आषाढी यात्रेसाठी एसटी विशेष बस सोडणार


मुंबई : यंदा आषाढी एकादशी १७जून ला असून त्यादिवशी राज्यभरातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. अनेक प्रवासी स्वत:ची खासगी वाहने, रेल्वे, एसटी किंवा विविध दींडीसोबत चालत पंढरपूर गाठतात. मात्र या विठूभक्तांसाठी एसटी महामंडळाकडून एक आनंदाची माहिती मिळत आहे. भाविकांसाठी आषाढी एकादशी निमित्त राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी या कालावधीत पाच हजार विशेष बस सोडण्याचे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे महामंडळाने सांगितले आहे.


या प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत अशा सुविधा आहेत.



चार तात्पुरती बस स्थानके


पंढरपूर यात्रेसाठी भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. या कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज), विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.



पुणे विभागाकडून पावणे तीनशे जादा बस


पुणे शहर आणि जिल्ह्यातून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाविकांची सोय व्हावी, म्हणून एसटी महामंडळाने आषाढीच्या निमित्ताने पुणे विभागातून २७५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, रायगड आणि पालघर विभागातून जादा बस मागविण्यात आल्या आहेत. १७ जूनला आषाढी एकादशी असून, दोन दिवस आधी बस सोडल्या जातील. आषाढी एकादशीच्या दिवशी २७५ जादा बस सोडल्या जातील. या सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.



फुकट्या प्रवाशांवर लगाम


पंढरपूर यात्रेनिमित्त फुकट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा अधिकारी २४ तास नजर ठेवून असणार आहेत. त्याचप्रमाणे विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार आहेत. याशिवाय आषाढी एकादशीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजनासाठी पोलिसांच्या सहाय्याने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह