रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : भारत सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका आधारकार्डशी लिंक न केल्यास त्यांना रेशनचा लाभ मिळणार नाही. यामुळे आधार लिंक करणे महत्वाचे आहे, यासाठी सरकारने मुदत दिली होती. दरम्यान, आता मुदतवाढीबाबत सरकारने निर्णय घेत केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.


अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, आता रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत ३० जून होती. यापूर्वीही सरकारने अनेकवेळा मुदत वाढवून दिली आहे. आता पुन्हा एकदा मुदत वाढ दिली आहे.


भारत सरकारने वन नेशन-वन रेशनची घोषणा केली. यासाठी सरकारने शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिका लवकरात लवकर आधारशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेकांकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत, हे थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकार देशातील सर्व बीपीएल कुटुंबांना शिधापत्रिकेद्वारे स्वस्त धान्य पुरवते.


ऑनलाईन रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करु शकता. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. आता येथे तुम्हाला आधार लिंकचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्यात भरा आणि सबमिट हा पर्याय निवडा. यानंतर, फोनवर मिळालेला ओटीपी यात भरा आणि पुन्हा एकदा सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर आधार रेशनकार्डशी लिंक झाल्याचा एक मेसेज मिळेल.

Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४