खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच दुतर्फा वाहतुकीची मुभा असतानाही, अवजड वाहतुकीची वाहनेही मार्गस्थ होत होती. यामध्ये एस. टी. बस फेऱ्यांचा देखील समावेश होता.मात्र आता घाटातून एस. टी. बसला बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग खात्याने दोन्ही बाजूला मजबूत हाईट खांबांची उभारणी करत, अटकाव केला आहे. यामुळे एस. टी. बसचालकांची कोंडी झाली असून, कशेडी घाटाचा वापर करावा लागत आहे. यापूर्वी कशेडी बोगद्यातून दोन्ही दिशांना एस. टी. बसेसदेखील धावत होत्या. मात्र रत्नागिरीसह रायगड प्रशासनाने अवजड वजनांच्या वाहनांपाठोपाठ एस. टी. सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला.
कशेडी बंगला येथून परिसरातील २० ते २५ गावांचा यामुळे संपर्क तुटून ग्रामस्थांची परवड सुरू झाली होती. यानंतर पुन्हा वाहतुकीस परवानगी दिल्यानंतर दुतर्फा एस. टी. बससेवा सुरू होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…