Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातून एसटीला बंदी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच दुतर्फा वाहतुकीची मुभा असतानाही, अवजड वाहतुकीची वाहनेही मार्गस्थ होत होती. यामध्ये एस. टी. बस फेऱ्यांचा देखील समावेश होता.मात्र आता घाटातून एस. टी. बसला बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग खात्याने दोन्ही बाजूला मजबूत हाईट खांबांची उभारणी करत, अटकाव केला आहे. यामुळे एस. टी. बसचालकांची कोंडी झाली असून, कशेडी घाटाचा वापर करावा लागत आहे. यापूर्वी कशेडी बोगद्यातून दोन्ही दिशांना एस. टी. बसेसदेखील धावत होत्या. मात्र रत्नागिरीसह रायगड प्रशासनाने अवजड वजनांच्या वाहनांपाठोपाठ एस. टी. सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला.


कशेडी बंगला येथून परिसरातील २० ते २५ गावांचा यामुळे संपर्क तुटून ग्रामस्थांची परवड सुरू झाली होती. यानंतर पुन्हा वाहतुकीस परवानगी दिल्यानंतर दुतर्फा एस. टी. बससेवा सुरू होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या.

Comments
Add Comment

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक