AUS vs NAM: गोलंदाजीनंतर फलंदाजीतही ऑस्ट्रेलियाची कमाल, नामिबियाला ९ विकेटनी चारली धूळ

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला पराभवाची धूळ चारली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा गोलंदाजीत कमाल केली आणि त्यानंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी करत नामिबियाविरुद्ध ९ विकेट आणि ८६ बॉल राखत विजय मिळवला.


सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या नामिबियाला कांगारूंनी १७ षटकांतच ७२ धावांवर ऑलआऊट केले होते.


नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरामूसने केवळ सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर सलामीवीर मिशेल वॅन लिंगेनने १० धावा केल्या. बाकी त्यांचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पाने तर चार बळी घेत नामिबियाच्या फलंदाजांना पिचवर टिकूच दिले नाही. त्यांचे एकामागोएक फलंदाज बाद होत होते. अखेर त्यांचा डाव ७२ धावांवर संपुष्टात आला.


विजयासाठी नामिबियाने ऑस्ट्रेलियाला ७३ धावांचे अगदी सोपे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ५.४ षटकेच खेळावी लागली. सलामीवीर डेविड वॉर्नरने २० धावा केल्या तर ट्रेविसहेड ३४ धावांवर नाबाद राहिला. मिशेल मार्शने नाबाद १८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ९ विकेट राखत विजय मिळवला.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून