AUS vs NAM: गोलंदाजीनंतर फलंदाजीतही ऑस्ट्रेलियाची कमाल, नामिबियाला ९ विकेटनी चारली धूळ

  67

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला पराभवाची धूळ चारली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा गोलंदाजीत कमाल केली आणि त्यानंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी करत नामिबियाविरुद्ध ९ विकेट आणि ८६ बॉल राखत विजय मिळवला.


सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या नामिबियाला कांगारूंनी १७ षटकांतच ७२ धावांवर ऑलआऊट केले होते.


नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरामूसने केवळ सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर सलामीवीर मिशेल वॅन लिंगेनने १० धावा केल्या. बाकी त्यांचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पाने तर चार बळी घेत नामिबियाच्या फलंदाजांना पिचवर टिकूच दिले नाही. त्यांचे एकामागोएक फलंदाज बाद होत होते. अखेर त्यांचा डाव ७२ धावांवर संपुष्टात आला.


विजयासाठी नामिबियाने ऑस्ट्रेलियाला ७३ धावांचे अगदी सोपे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ५.४ षटकेच खेळावी लागली. सलामीवीर डेविड वॉर्नरने २० धावा केल्या तर ट्रेविसहेड ३४ धावांवर नाबाद राहिला. मिशेल मार्शने नाबाद १८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ९ विकेट राखत विजय मिळवला.

Comments
Add Comment

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची