AUS vs NAM: गोलंदाजीनंतर फलंदाजीतही ऑस्ट्रेलियाची कमाल, नामिबियाला ९ विकेटनी चारली धूळ

  63

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला पराभवाची धूळ चारली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा गोलंदाजीत कमाल केली आणि त्यानंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी करत नामिबियाविरुद्ध ९ विकेट आणि ८६ बॉल राखत विजय मिळवला.


सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या नामिबियाला कांगारूंनी १७ षटकांतच ७२ धावांवर ऑलआऊट केले होते.


नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरामूसने केवळ सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर सलामीवीर मिशेल वॅन लिंगेनने १० धावा केल्या. बाकी त्यांचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पाने तर चार बळी घेत नामिबियाच्या फलंदाजांना पिचवर टिकूच दिले नाही. त्यांचे एकामागोएक फलंदाज बाद होत होते. अखेर त्यांचा डाव ७२ धावांवर संपुष्टात आला.


विजयासाठी नामिबियाने ऑस्ट्रेलियाला ७३ धावांचे अगदी सोपे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ५.४ षटकेच खेळावी लागली. सलामीवीर डेविड वॉर्नरने २० धावा केल्या तर ट्रेविसहेड ३४ धावांवर नाबाद राहिला. मिशेल मार्शने नाबाद १८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ९ विकेट राखत विजय मिळवला.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार