AUS vs NAM: गोलंदाजीनंतर फलंदाजीतही ऑस्ट्रेलियाची कमाल, नामिबियाला ९ विकेटनी चारली धूळ

  68

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला पराभवाची धूळ चारली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा गोलंदाजीत कमाल केली आणि त्यानंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी करत नामिबियाविरुद्ध ९ विकेट आणि ८६ बॉल राखत विजय मिळवला.


सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या नामिबियाला कांगारूंनी १७ षटकांतच ७२ धावांवर ऑलआऊट केले होते.


नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरामूसने केवळ सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर सलामीवीर मिशेल वॅन लिंगेनने १० धावा केल्या. बाकी त्यांचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पाने तर चार बळी घेत नामिबियाच्या फलंदाजांना पिचवर टिकूच दिले नाही. त्यांचे एकामागोएक फलंदाज बाद होत होते. अखेर त्यांचा डाव ७२ धावांवर संपुष्टात आला.


विजयासाठी नामिबियाने ऑस्ट्रेलियाला ७३ धावांचे अगदी सोपे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ५.४ षटकेच खेळावी लागली. सलामीवीर डेविड वॉर्नरने २० धावा केल्या तर ट्रेविसहेड ३४ धावांवर नाबाद राहिला. मिशेल मार्शने नाबाद १८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ९ विकेट राखत विजय मिळवला.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता