Tips: या टिप्स करा फॉलो… कमीत कमी पेट्रोलमध्ये चालणार कार

Share

मुंबई: गाडी चालवताना कार मालक नेहमी पेट्रोलबाबत चिंतित असतो. प्रत्येकजण कोणत्या ना कारणाने पेट्रोल कसे वाचवता येईल याकडे लक्ष असते. जर गाडी चालवताना काही बाबींवर लक्ष ठेवले तर कारचा मायलेज वाढू शकतो. आम्ही आज तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या गाडीचे इंधन वाचू शकते आणि दूरचा प्रवास करू शकता.

टायरच्या प्रेशवर ठेवा लक्ष

टायरचा प्रेशर आणि मायलेज यांच्यात संबंध आहे. गाडीच्या टायरमध्ये हवा कमी-जास्त असल्यास टायर आणि रोड यांच्यातील संपर्कात फरक पडतो. यामुळे टायर रस्त्यावर योग्य ग्रिप पकडू शकत नाही. कार निर्माता कंपनी टायरमध्ये किती हवा भरली पाहिजे याची माहिती देतात.

सतत एसी सुरू ठेवल्याने कमी होते मायलेज

कारच्या आत सतत एसी चालू ठेवल्यास कारचा मायलेज ३० टक्क्यांपर्यंत कमी होते. कारचा एसी सुरू ठेवल्याने जितक्या फ्युएलमध्ये तुम्ही ५०० किमीचा प्रवास करत असाल तितक्याच फ्युएलमध्ये एसी बंद केल्यास तुम्ही ६०० ते ६५० किमीचा प्रवास करू शकता.

योग्य गिअरचा वापर

कारचे गिअर योग्य पद्धतीने वापरल्यास कारचा मायलेज वाढण्यास मदत होते. अचानकपणे कारचा स्पीड वाढवणे आणि अचानक स्पीड कमी केल्याने कारच्या मायलेजवर परिणाम होतो. जर तुम्ही पाचव्या गिअरमध्ये ८० किमी प्रति तासाच्या स्पीडने गाडी चालवत आहात तर गाडीचा मायलेज चांगला करण्यासाठी हा एक योग्य स्पीड आहे.

Tags: driving

Recent Posts

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

1 minute ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

2 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

52 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago