Mumbai Local : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेचा वेग पुन्हा मंदावला

प्रवाशांकडून प्रशासनावर तीव्र संताप


मुंबई : काही दिवसांपूर्वी रेल्वे फलाट विस्तारीकरणासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. त्यावेळी असंख्य रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र तरीही मध्य रेल्वेची (Central Railway) परिस्थिती फारशी सुधरली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन दिवसीय जम्बोब्लॉक नंतरही खोळंबा होत असल्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्गावर सुधारणा करूनही कालपासून अनेक गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. दादर (Dadar) ते सीएसएमटी (CSMT) स्थानकादरम्यान रेल्वेचा वेग मंदावल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. आजही परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी जास्तीचा वेळ हातात घेऊन प्रवासासाठी निघावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


प्रवाशांकडून प्रशासनावर संताप


पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आल्यानंतरही मध्य रेल्वेवरील अनेक गाड्यांचा वेग मोठ्या फरकाने मंदावतो. त्यातच आता विलंबात यंत्रणेमुळे होणाऱ्या उशिराची भर पडताना दिसत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांसह इतर प्रवाशांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या