Mahavikas Aghadi : ठाकरेंची विधान परिषदेतही पुन्हा तीच चूक! काँग्रेसचे नेते प्रचंड नाराज

महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाची ठिणगी


मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महायुतीपेक्षा (Mahayuti) जास्त जागा जिंकल्याने आता मविआ राज्यात एकनिष्ठ राहून काम करेल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, या अंदाजाला छेद देत मविआने पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी सांगलीतून थेट ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर केला होता. यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि अंतिमतः विशाल पाटीलच विजयी झाले. यामुळे मविआला मोठा फटका बसला. मात्र, यातून धडा न घेता ठाकरेंनी पुन्हा तशीच चूक विधानपरिषदेत (Vidhan Parishad) केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत.


महाविकास आघाडीत आता नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने विधानपरिषदेचे परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी अगोदर चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.



कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही


उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.



कधी होणार विधानपरिषद निवडणुका?


दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे. तर ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे