Mahavikas Aghadi : ठाकरेंची विधान परिषदेतही पुन्हा तीच चूक! काँग्रेसचे नेते प्रचंड नाराज

महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाची ठिणगी


मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महायुतीपेक्षा (Mahayuti) जास्त जागा जिंकल्याने आता मविआ राज्यात एकनिष्ठ राहून काम करेल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, या अंदाजाला छेद देत मविआने पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी सांगलीतून थेट ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर केला होता. यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि अंतिमतः विशाल पाटीलच विजयी झाले. यामुळे मविआला मोठा फटका बसला. मात्र, यातून धडा न घेता ठाकरेंनी पुन्हा तशीच चूक विधानपरिषदेत (Vidhan Parishad) केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत.


महाविकास आघाडीत आता नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने विधानपरिषदेचे परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी अगोदर चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.



कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही


उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.



कधी होणार विधानपरिषद निवडणुका?


दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे. तर ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

Comments
Add Comment

Bandra : वांद्रेतील नर्सिंग महाविद्यालय पीपीपी आधारीतच

मुंबई  : महापालिकेच्या वतीने वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावरील भाभा रुग्णालयाजवळील आरोग्याबाबत

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक