Aditya Sarpotdar : मुंज्याच्या यशानंतर आदित्य सरपोतदारचा आणखी एक हॉररपट!

'ही' जोडी दिसणार मुख्य भूमिकेत


मुंबई : मराठी सिनेसृष्टीला 'नारबाची वाडी', 'उलाढाल', 'झोंबिवली', 'सतरंगी रे', 'माऊली' असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) आता हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावत आहे. त्याने दिग्दर्शित केलेला 'मुंज्या' हा चित्रपट (Munjya Movie) कोणतंही बिग बजेट नसताना आणि स्टारकास्टही नसताना प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतो आहे. केवळ तीन दिवसांत या सिनेमाने २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुंज्याच्या या यशानंतर आदित्य आपल्या नव्या प्रोजेक्टकडे वळणार आहे. एक नवा हॉररपट घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ककुडा' (Kakuda) असं या चित्रपटाचं आहे


निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी २० जुलै २०२१ रोजी 'ककुडा' या चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर आता सिनेमा प्रदर्शित करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. बॉलिवूड आणि मराठीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा लय भारी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर सध्या भन्साळींच्या 'हिरामंडी' या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) रितेशच्या जोडीला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.


रितेशचा हा आदित्य सरपोतदारसोबतचा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी 'माऊली' या मराठी चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. आता ते 'ककुडा' या चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहे. भारतीय लोककथेवर हा चित्रपटाची कथा आधारीत आहे. ककुडादेखील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन चिराग गर्ग आणि अविनाश द्विवेदी यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे.



सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज?


मिळालेल्या माहितीनुसार, 'ककुडा' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आदित्य सरपोतदारने याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. ओटीटी अथवा थिएटरमध्येही हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. येत्या २-३ महिन्यात हा चित्रपट रिलीज होईल असे आदित्यने सांगितले आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई