मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात ९ जूनला सामना रंगला आहे. गयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाला खूपच मानहानीकरक पद्धतीने हरवले.
या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा खेळताना ५ बाद १७३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरासाठी मैदानात खेळण्यासाठी उतरलेल्या युगांडाचा नवखा संघ अवघ्या ३९ धावांवर आटोपला. या पद्धतीने वेस्ट इंडिजने तब्बल १३४ धावांनी विजय मिळवला.
वेस्ट इंडिजच्या विजयाचे हिरो ठरला अकील हुसैन. त्याने ११ धावांमध्ये ५ बळी मिळवले. अकीलची ही कामगिरी टी-२० वर्ल्डकपमधील कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपेक्षा सरस आहे.
तर युगांडाच्या संघाने टी-२० वर्ल्डकपमधील लाजिरवाण्या रेकॉर्डशी बरोबरी केली. दरम्यान, ३९ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या नवख्या संघाने रेकॉर्डशी बरोबरी केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये २४ मार्च २०१४मध्ये नेदरलँड्सच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध ३९ धावा केल्या होत्या.
हा वेस्ट इंडिजचा सर्व टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात मोठा विजय आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…