WI vs Uganda:टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा प्रचंड विजय, युगांडाला ३९ धावांवर केले ऑलआऊट

  66

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात ९ जूनला सामना रंगला आहे. गयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाला खूपच मानहानीकरक पद्धतीने हरवले.


या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा खेळताना ५ बाद १७३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरासाठी मैदानात खेळण्यासाठी उतरलेल्या युगांडाचा नवखा संघ अवघ्या ३९ धावांवर आटोपला. या पद्धतीने वेस्ट इंडिजने तब्बल १३४ धावांनी विजय मिळवला.


वेस्ट इंडिजच्या विजयाचे हिरो ठरला अकील हुसैन. त्याने ११ धावांमध्ये ५ बळी मिळवले. अकीलची ही कामगिरी टी-२० वर्ल्डकपमधील कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपेक्षा सरस आहे.


तर युगांडाच्या संघाने टी-२० वर्ल्डकपमधील लाजिरवाण्या रेकॉर्डशी बरोबरी केली. दरम्यान, ३९ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या नवख्या संघाने रेकॉर्डशी बरोबरी केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये २४ मार्च २०१४मध्ये नेदरलँड्सच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध ३९ धावा केल्या होत्या.


हा वेस्ट इंडिजचा सर्व टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात मोठा विजय आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी