WI vs Uganda:टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा प्रचंड विजय, युगांडाला ३९ धावांवर केले ऑलआऊट

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात ९ जूनला सामना रंगला आहे. गयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाला खूपच मानहानीकरक पद्धतीने हरवले.


या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा खेळताना ५ बाद १७३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरासाठी मैदानात खेळण्यासाठी उतरलेल्या युगांडाचा नवखा संघ अवघ्या ३९ धावांवर आटोपला. या पद्धतीने वेस्ट इंडिजने तब्बल १३४ धावांनी विजय मिळवला.


वेस्ट इंडिजच्या विजयाचे हिरो ठरला अकील हुसैन. त्याने ११ धावांमध्ये ५ बळी मिळवले. अकीलची ही कामगिरी टी-२० वर्ल्डकपमधील कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपेक्षा सरस आहे.


तर युगांडाच्या संघाने टी-२० वर्ल्डकपमधील लाजिरवाण्या रेकॉर्डशी बरोबरी केली. दरम्यान, ३९ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या नवख्या संघाने रेकॉर्डशी बरोबरी केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये २४ मार्च २०१४मध्ये नेदरलँड्सच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध ३९ धावा केल्या होत्या.


हा वेस्ट इंडिजचा सर्व टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात मोठा विजय आहे.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय